शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

परभणी जिल्ह्यातील ३४ शाळांमध्येच परिवहन समितींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:23 IST

जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

परभणी:  सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ ३४ शाळांनीच परिवहन समितीची स्थापना केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करुन त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश करुन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे; परंतु, जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून शासनाच्या आदेशाला दरवर्षीच खो देण्यात येतो.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १७४२ शाळा आहेत. यामधील केवळ ३४ शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्यात आली आहे. उर्वरित जवळपास १७०० शाळांमध्ये परिवहन समिती स्थापनेला शाळा प्रशासनाकडून खो देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेपासून घरापर्यंत होणारा प्रवास सुरक्षित आहे का? याबाबत या शाळा गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर राज्य शासन दरवर्षी या खाजगी शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश देते; परंतु, या शाळांकडून शासनाच्या आदेशालाही खो देण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन समिती स्थापन करण्यात आली नाही, त्या शाळांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाparabhaniपरभणीEducation Sectorशिक्षण क्षेत्र