शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परभणी जिल्ह्यातील ३४ शाळांमध्येच परिवहन समितींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:23 IST

जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

परभणी:  सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. मात्र जिल्ह्यातील केवळ ३४ शाळांनीच परिवहन समितीची स्थापना केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७०० शाळांनी या परिवहन समितीला खो दिल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करुन त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश करुन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे; परंतु, जिल्ह्यातील खाजगी शाळांकडून शासनाच्या आदेशाला दरवर्षीच खो देण्यात येतो.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १७४२ शाळा आहेत. यामधील केवळ ३४ शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्यात आली आहे. उर्वरित जवळपास १७०० शाळांमध्ये परिवहन समिती स्थापनेला शाळा प्रशासनाकडून खो देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेपासून घरापर्यंत होणारा प्रवास सुरक्षित आहे का? याबाबत या शाळा गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर राज्य शासन दरवर्षी या खाजगी शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश देते; परंतु, या शाळांकडून शासनाच्या आदेशालाही खो देण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन समिती स्थापन करण्यात आली नाही, त्या शाळांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाparabhaniपरभणीEducation Sectorशिक्षण क्षेत्र