शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:17 IST

परभणी : सेंद्रिय शेतमालास बाजारात मोठी मागणी आहे. सेंद्रीय शेती संशोधनाबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आवश्यक सेंद्रीय ...

परभणी : सेंद्रिय शेतमालास बाजारात मोठी मागणी आहे. सेंद्रीय शेती संशोधनाबरोबरच उपलब्ध तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आवश्यक सेंद्रीय निविष्ठा शेतावरच तयार करणे, विविध तंत्रज्ञान पद्धतीचा शेतकऱ्यांच्या शेतावर वापर करणे, सेंद्रीय प्रक्रिया उद्योग या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व हैदराबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २१ मार्च या काळात सातदिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणाच्या उद्‌घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. ढवण बोलत होते.

अध्यक्षस्थानी गाझियाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, जबलपूर येथील डॉ. ए. एस. राजपूत, गंगटोक येथील डॉ. रविकांत अवस्थी, पुणे येथील उपसंचालक अशोक बाणखेले, आयोजक डॉ. वाचस्पती पांडे, डॉ. आनंद गोरे, डॉ. रामानजानेयलू, डॉ. रणजित चव्हाण आदींची उपस्थिती होती. डॉ. ढवण म्हणाले, देशात विविध भागात सेंद्रीय शेती पद्धतीत मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. सेंद्रीय शेती संशोधनाच्या दृष्टीने आंतरशाखीय दृष्टिकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी समन्वय महत्त्वाचा आहे. सेंद्रीय शेतीबाबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ व शेतकरी यांचे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

डॉ. ए. एस. राजपूत, डॉ. आर. के. अवस्थी, अशोक बाणखेले यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. वाचस्पती पांडे यांनी प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी ‘सेंद्रीय शेतीमध्ये पीक व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजित कदम, डॉ. सुनील जावळे, श्रीधर पतंगे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी प्रयत्न केले.