शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 17:52 IST

OBC Reservation : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे.

जिंतूर ( परभणी ) : ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) मिळावे यासाठी आता मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन काय उपयोग. आटापिटा करणारे राज्य सरकार इतक्या दिवस झोपा काढत होते का ? असा सवाल भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी केला. तसेच जर महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणूका ठरतील, असा इशाराही मुंडे यांनी आज येथे दिला. 

तालुक्यातील धमधम येथे श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार तोताराम कायंदे, हभप सुदाम महाराज, प्रवीण घुगे, लक्ष्मण बुधवंत, बबन महाराज हंडीकर, भगवान वटाणे, बाळासाहेब घुगे, खंडेराव आघाव, केशव घुले, योगेश घुगे, सुरेश भुमरे, प्रमोद कराड आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे. आता हेच राज्यकर्ते आरक्षण मिळावे यासाठी मंत्रिमंडळात ठराव घेत आहेत. वेळ निघून गेल्यानंतर ठरावाचा काय उपयोग ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय आगामी निवडणुका झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणुका ठरतील, त्यास राज्यकर्ते जबाबदार राहतील. त्यांना ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही, असा इशारा देखील मुंडे यांनी यावेळी दिला. 

ओबीसींसाठी मोठा लढा उभारू सत्तेत असणारे मराठा नेते समाजाला आरक्षण मिळावे म्हणून यापूर्वी कधीही पुढे आले नाहीत.  कारण त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखाने व मोठे उद्योगधंदे चालवायचे होते. सामान्य मराठा समाजाच्या तरुणाकडे लक्ष देण्यास मराठा समाजातील नेत्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळेच आज मराठा समाजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. भविष्यात ओबीसीसाठी मोठा लढा उभारू, अशी घोषणा देखील मुंडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेOBC Reservationओबीसी आरक्षणparabhaniपरभणी