शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक म्हणजे 'काळी निवडणूक' : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 17:52 IST

OBC Reservation : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे.

जिंतूर ( परभणी ) : ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Reservation) मिळावे यासाठी आता मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन काय उपयोग. आटापिटा करणारे राज्य सरकार इतक्या दिवस झोपा काढत होते का ? असा सवाल भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी केला. तसेच जर महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणूका ठरतील, असा इशाराही मुंडे यांनी आज येथे दिला. 

तालुक्यातील धमधम येथे श्री संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार तोताराम कायंदे, हभप सुदाम महाराज, प्रवीण घुगे, लक्ष्मण बुधवंत, बबन महाराज हंडीकर, भगवान वटाणे, बाळासाहेब घुगे, खंडेराव आघाव, केशव घुले, योगेश घुगे, सुरेश भुमरे, प्रमोद कराड आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारले आहे. आता हेच राज्यकर्ते आरक्षण मिळावे यासाठी मंत्रिमंडळात ठराव घेत आहेत. वेळ निघून गेल्यानंतर ठरावाचा काय उपयोग ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय आगामी निवडणुका झाल्या तर त्या इतिहासातील काळ्या निवडणुका ठरतील, त्यास राज्यकर्ते जबाबदार राहतील. त्यांना ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही, असा इशारा देखील मुंडे यांनी यावेळी दिला. 

ओबीसींसाठी मोठा लढा उभारू सत्तेत असणारे मराठा नेते समाजाला आरक्षण मिळावे म्हणून यापूर्वी कधीही पुढे आले नाहीत.  कारण त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखाने व मोठे उद्योगधंदे चालवायचे होते. सामान्य मराठा समाजाच्या तरुणाकडे लक्ष देण्यास मराठा समाजातील नेत्यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळेच आज मराठा समाजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. भविष्यात ओबीसीसाठी मोठा लढा उभारू, अशी घोषणा देखील मुंडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेOBC Reservationओबीसी आरक्षणparabhaniपरभणी