शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

परभणी लोकसभेची निवडणूक:वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:49 IST

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यस्तरावरील सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न चांगलाचा प्रभावी ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बाबत झालेली चर्चा मतमोजणीनंतर खरीच असल्याचे अधोरेखीत झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राजकारणात नवखे असलेले हैदराबाद येथील आलमगीर मोहम्मद खान यांनी निवडणूक लढविली. त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा व पाथरी येथे जाहीर सभा घेतल्या. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात बरीच मेहनत घेतली.प्रचारसभा, रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना साकडे घातले. परिणामी लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात आलमगीर खान यांना बºयापैकी मते मिळाली आहेत. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ७९, परभणी विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ३३५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ३२ हजार ८०६, पाथरी विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ८२९, परतूर विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ७०० आणि घनसावंगी मतदारसंघातून २१ हजार ८५ अशी एकूण १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली.विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना विजयी मतापेक्षा जवळपास तीनपट जास्तीची मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे स्वप्न वंचित बहुजन आघाडीमुळे पूर्ण होऊ शकले नाही.विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादीच्याच पारंपारिक व्होटबँकेला सुरुंग लावला. त्यामुळे शिवसेनेचा निवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळाले.राजकीय जाणकारांना ‘वंचित’ फॅक्टर कारणीभूत वाटेना४एकीकडे वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीमधीलच काही नेत्यांना वंचित आघाडी पराभवासाठी कारणीभूत वाटत नाही. वंचित बहुजन आघाडी पारंपारिक मते घेणार, याची पूर्व कल्पना होती.४ मग वंचितकडे जाणारी तसेच शिवसेनेकडीच मते राष्ट्रवादीकडे का खेचली गेली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिग्गज नेते व काही कार्यकर्त्यांचे अपयश लपविण्यासाठी वंचितला दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल