शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

परभणी लोकसभेची निवडणूक:वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:49 IST

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांनी तब्बल १ लाख ४९ हजार ९४६ मते घेतल्याने परभणी लोकसभा जिंकण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या विजयाचा सुकर झाला आहे.लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा राज्यस्तरावरील सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न चांगलाचा प्रभावी ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचित बाबत झालेली चर्चा मतमोजणीनंतर खरीच असल्याचे अधोरेखीत झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राजकारणात नवखे असलेले हैदराबाद येथील आलमगीर मोहम्मद खान यांनी निवडणूक लढविली. त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा व पाथरी येथे जाहीर सभा घेतल्या. शिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात बरीच मेहनत घेतली.प्रचारसभा, रॅली, बैठका आदींच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना साकडे घातले. परिणामी लोकसभा निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात आलमगीर खान यांना बºयापैकी मते मिळाली आहेत. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ७९, परभणी विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ३३५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ३२ हजार ८०६, पाथरी विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ८२९, परतूर विधानसभा मतदारसंघातून २१ हजार ७०० आणि घनसावंगी मतदारसंघातून २१ हजार ८५ अशी एकूण १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली.विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा ४२ हजार १९९ मतांनी पराभव केला. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना विजयी मतापेक्षा जवळपास तीनपट जास्तीची मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचे स्वप्न वंचित बहुजन आघाडीमुळे पूर्ण होऊ शकले नाही.विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादीच्याच पारंपारिक व्होटबँकेला सुरुंग लावला. त्यामुळे शिवसेनेचा निवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे पहावयास मिळाले.राजकीय जाणकारांना ‘वंचित’ फॅक्टर कारणीभूत वाटेना४एकीकडे वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीमधीलच काही नेत्यांना वंचित आघाडी पराभवासाठी कारणीभूत वाटत नाही. वंचित बहुजन आघाडी पारंपारिक मते घेणार, याची पूर्व कल्पना होती.४ मग वंचितकडे जाणारी तसेच शिवसेनेकडीच मते राष्ट्रवादीकडे का खेचली गेली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिग्गज नेते व काही कार्यकर्त्यांचे अपयश लपविण्यासाठी वंचितला दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल