शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

सोनपेठ : सध्या नीचांकी तापमानामुळे कडाक्याची थंडी जाणवत असली तरीही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. सोनपेठ तालुक्यातील ...

सोनपेठ : सध्या नीचांकी तापमानामुळे कडाक्याची थंडी जाणवत असली तरीही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे.

सोनपेठ तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर गावागावातील पॅनल प्रमुख उमेदवार बघून त्यांना अत्यावश्यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करीत आहेत. यात त्यांची होत असलेली दमछाक आणि माणसांना भेटण्याचा सपाटा बघून निवडणुकांचा उकाडाच जणू गावातील नागरिक अनुभवत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून यातून मोठमोठे नेते तयार झाल्याचा राजकीय इतिहास आहे. शिवाय पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने राज्य शासनाचा थेट निधी ग्रामपंचायतींना मिळू लागल्याने गावाचा सर्वांगीण विकास होऊ लागला आहे. गावाच्या विकासात फक्त माझाच वाटा असावा अशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहणाऱ्यांची मनोमन इच्छा झाल्याने आणि गावातील असलेल्या वेगवेगळ्या पक्षीय व गटातटाच्या राजकारणातील संघर्षाचा थेट परिणाम या गावांच्या निवडणुकांमध्ये पाहावयास मिळत आहे. यामुळे गावाच्या विकासासोबतच राजकीय पटलावरची सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जाते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या होऊ लागल्या आहेत. यामुळे निवडणुकीतील साम-दाम-दंडभेद या सगळ्या अस्त्रांचा वापर या निवडणुकीत होत असल्याचे मागील काही निवडणुकांवरून लक्षात आले आहे. कडाक्याच्या थंडीचा बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोट्यांपासून ते गावातील प्रत्येक पारावर सध्या गरमागरम राजकीय चर्चांमुळे सामान्य माणूस ऐन थंडीतही राजकीय उकाडा अनुभवत आहे.

तालुक्यातून एकूण ३२९ सदस्य निवडले जाणार

सोनपेठ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील १२५ प्रभागांमधून ३२९ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडले जाणार असून, यात एकूण ५०२४७ मतदार १२५ मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तालुका प्रशासनाकडूनही जय्यत तयारी

ही निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे.

यासाठी ७०० कर्मचारी नेमले असून, यातील ५०० जण प्रत्यक्षात असतील, तर २०० कर्मचारी राखीव असणार आहेत.

१० निवडणूक निर्वाचन अधिकारी व १० सहायक निवडणूक अधिकारी धुरा सांभाळणार असून या सगळ्यांवर तहसीलदार डाॅ. आशिषकुमार बिरादार, ऐश्वर्या गिरी व नायब तहसीलदार अनिल घनसावंत विशेष लक्ष देऊन असणार आहेत.