शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी सकाळी ११ वाजता परभणी तालुक्यातील शेतकरी एकत्र आले. गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातून या मोर्चास सुरुवात झाली़ नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चा दरम्यान, शेतकºयांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते़जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकºयांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकºयांनाच विम्याचा लाभ देत उर्वरित शेतकºयांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्र्चेकºयांच्या वतीने पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़आयआरडीएला पत्र पाठविणार - झळके यांचे आश्वासनशेतकºयांच्या प्रश्नावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाच्या वतीने गणेशराव घाटगे यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याकडे दोन मागण्या आग्रहाने मांडल्या. त्यात जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमधील शेतकºयांची फसवणूक झाली आहे. त्या सर्व शेतकºयांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पीक विम्या संदर्भात शेतकºयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा संदर्भात शेतकºयांच्या तक्रारी वाढत असल्याचे आरयआरडीएला कळवावे, अशी मागणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक झळके यांनी आयआरडीएला पत्र पाठविले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी गणेश घाटगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्यायालयीन लढ्याची तयारीपीक विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली असून या कंपनीच्या विरोधात आंदोलन करुनही प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी केली जाईल. यासाठी प्रत्येक घराघरातून तक्रारीचे अर्ज भरुन घेत कृषी विभागात ते दाखल केले जाणार आहेत. या अर्जांवरुन न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती गणेश घाटगे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani spपोलीस अधीक्षक, परभणीFarmerशेतकरी