शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी सकाळी ११ वाजता परभणी तालुक्यातील शेतकरी एकत्र आले. गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातून या मोर्चास सुरुवात झाली़ नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चा दरम्यान, शेतकºयांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते़जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकºयांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकºयांनाच विम्याचा लाभ देत उर्वरित शेतकºयांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्र्चेकºयांच्या वतीने पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़आयआरडीएला पत्र पाठविणार - झळके यांचे आश्वासनशेतकºयांच्या प्रश्नावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाच्या वतीने गणेशराव घाटगे यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याकडे दोन मागण्या आग्रहाने मांडल्या. त्यात जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमधील शेतकºयांची फसवणूक झाली आहे. त्या सर्व शेतकºयांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पीक विम्या संदर्भात शेतकºयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा संदर्भात शेतकºयांच्या तक्रारी वाढत असल्याचे आरयआरडीएला कळवावे, अशी मागणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक झळके यांनी आयआरडीएला पत्र पाठविले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी गणेश घाटगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्यायालयीन लढ्याची तयारीपीक विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली असून या कंपनीच्या विरोधात आंदोलन करुनही प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी केली जाईल. यासाठी प्रत्येक घराघरातून तक्रारीचे अर्ज भरुन घेत कृषी विभागात ते दाखल केले जाणार आहेत. या अर्जांवरुन न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती गणेश घाटगे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani spपोलीस अधीक्षक, परभणीFarmerशेतकरी