शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:19 IST

जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी सकाळी ११ वाजता परभणी तालुक्यातील शेतकरी एकत्र आले. गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातून या मोर्चास सुरुवात झाली़ नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चा दरम्यान, शेतकºयांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते़जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकºयांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकºयांनाच विम्याचा लाभ देत उर्वरित शेतकºयांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्र्चेकºयांच्या वतीने पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़आयआरडीएला पत्र पाठविणार - झळके यांचे आश्वासनशेतकºयांच्या प्रश्नावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाच्या वतीने गणेशराव घाटगे यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याकडे दोन मागण्या आग्रहाने मांडल्या. त्यात जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमधील शेतकºयांची फसवणूक झाली आहे. त्या सर्व शेतकºयांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पीक विम्या संदर्भात शेतकºयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा संदर्भात शेतकºयांच्या तक्रारी वाढत असल्याचे आरयआरडीएला कळवावे, अशी मागणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक झळके यांनी आयआरडीएला पत्र पाठविले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी गणेश घाटगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्यायालयीन लढ्याची तयारीपीक विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली असून या कंपनीच्या विरोधात आंदोलन करुनही प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी केली जाईल. यासाठी प्रत्येक घराघरातून तक्रारीचे अर्ज भरुन घेत कृषी विभागात ते दाखल केले जाणार आहेत. या अर्जांवरुन न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती गणेश घाटगे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani spपोलीस अधीक्षक, परभणीFarmerशेतकरी