शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

परभणीतील प्रकल्पांत आठ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:19 IST

जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एकीकडे पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने चिंतेचे मळभ दाट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह गोदावरी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पावसाळ्याचा दीड महिना लोटला तरी या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही दाखल झाला नसल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली आहे. एकीकडे पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा नसल्याने चिंतेचे मळभ दाट होत आहे.दोन वर्षापासून जिल्हावासीय पावसाच्या अनियमिततेमुळे वेगवेगळ्या संकटांना तोंड देत आहेत. पावसावर आधारित असलेल्या शेतीत दर वर्षी नुकसान सहन करावे लागत आहे. पावसाळ्यामध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी पाऊस पडावा म्हणून देवाकडे साकडे घातले जात आहे. तर पाणीसाठा न झाल्याने त्याचा परिणाम उन्हाळ्यात सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हावासियांना तीव्र स्वरुपाच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. यावर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती बदलली जाईल आणि पाण्याचे संकट कमी होईल, अशी आशा होती. मात्र ही आशा फोल ठरली आहे. पावसाळ्यातील दीड महिन्याचा काळ उलटला. या काळात जिल्ह्यामध्ये ११८.१६ मि.मी.पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १५ टक्के पावसाची नोंद झाली. या दीड महिन्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने जमिनीतच पाऊस मुरला नाही. परिणामी प्रकल्पांमध्ये पाण्यचा एक थेंबही वाढलेला नाही.जिल्ह्यात येलदरी, निम्न दुधना या दोन मोठ्या प्रकल्पांबरोबरच करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्प आणि गोदावरी नदीवर बांधलेल्या चार बंधाऱ्यांमधून पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध केली जाते. मागील वर्षी सर्व प्रकल्प कोरडेठाक झाले आहेत. एकाही प्रकल्पामध्ये जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही.जिल्ह्यातील लघु प्रकल्प वगळता मोठ्या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १९५१.३४ दलघमी एवढी आहे. प्रत्यक्षात सर्व प्रकल्पांमधील पाण्याची गोळा बेरीज केली असता १५६.९७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे हा पाणीसाठा मृत साठ्यातील आहे. त्याची टक्केवार ८ टक्के एवढी आहे.पावसाळ्यातही : ६८ टँकर सुरु४जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना टँकरच्या सहाय्याने पाणी देण्यात आले. यावर्षी १०९ टँकर प्रशासनाला वापरावे लागले होते. ३० जूनपर्यंतचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. जून महिना ओलांडून अर्धा जुलै महिना सरला तरी अनेक गावांमधील पाणीटंचाई हटली नाही. परिणामी ६८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.४त्यात पालम तालुक्यात सर्वाधिक १६, पूर्णा, गंगाखेड तालुक्यात प्रत्येकी १२, जिंतूर १०, मानवत ६, सेलू ५, सोनपेठ, परभणी प्रत्येकी ३ आणि पाथरी तालुक्यात एका टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातही प्रशासनाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.४विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाने टँकरसाठी ७० विहिरी अधिग्रहित केल्या असून टँकर व्यतिरिक्तही ३५९ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली जात आहे.प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा४येलदरी १०१.५५ दलघमी,४निम्न दुधना ५४.४९ दलघमी,४करपरा ०.९३ दलघमी,४कोरडे प्रकल्प : झरी, मासोळी, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी, पिंपळदरी तलावजुलैमध्ये १८ टक्के पाऊस४१ ते १५ जुलै या काळात केवळ १८.६ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जुलै महिन्यामध्ये २१०.८२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत केवळ ३९.२० मि.मी. पाऊस १५ दिवसांत झाला असून त्यात सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ५२ मि.मी., पाथरी तालुक्यात ५१ मि.मी., मानवत ४३, जिंतूर ४५.१६, पालम ३८.९९, गंगाखेड ३४.२५, पूर्णा ३४.६०, परभणी ३५ आणि सेलू तालुक्यात १७.८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सरासरीच्या तुलनेत केवळ १५ टक्के पाऊस४परभणी जिल्ह्यात दीड महिन्यामध्ये केवळ १५.३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४.६२ मि.मी. असून त्या तुलनेत ११८ मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यामध्ये झाली आहे.४ त्यात मानवत तालुक्यात सर्वाधिक १४८.६७ मि.मी., सोनपेठ तालुक्यात १३९.५० मि.मी., गंगाखेड १३२.५०, जिंतूर १२९.१६, पूर्णा १२४.२०, परभणी १०६.७५, पाथरी १११, पालम ९७.६६ आणि सेलू तालुक्यात ७४ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीची तुलना करता सेलू तालुक्यात केवळ ९.१ टक्के पाऊस झाला आहे.४सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक २० टक्के, पाथरी तालुक्यात १४.४ टक्के, जिंतूर १५.९ टक्के, पालम १४ टक्के, मानवत १८.२ टक्के, गंगाखेड १९ टक्के, पूर्णा १५.४ टक्के आणि परभणी तालुक्यात १३.३ टक्के पाऊस झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीRainपाऊस