शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST

कोरोनाचा सामना करणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्य तेलाचे दरही दिवसेंदिवस गगनाला ...

कोरोनाचा सामना करणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीबरोबरच सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्य तेलाचे दरही दिवसेंदिवस गगनाला भिडू लागले. सोयाबीन तेलाचे १५ किलोचे दर हे २ हजार ६४० रुपयांवर जावून पोहोचले होते; मात्र दोन दिवसांपूर्वी खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हेच दर आता २ हजार ४०० रुपयांवर येऊन पोहोचले आहेत तर दुसरीकडे १८५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणारे शेंगदाणा तेल परभणीच्या बाजारपेठेत १७० रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री झाले. १४८ रुपये प्रतिकिलोने विकणारे पाम तेल १४० रुपये किलोवर आले आहे.

२२० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे करडईचे तेल २० रुपये प्रतिकिलो कमी झाले आहे. २ हजार ६८० रुपयांनी सूर्यफूल तेलाची विक्री होणारी कॅन २ हजार ५५० रुपयांवर येऊन पेाहोचली आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त होत आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला असून, सर्वसामान्यांचे बजेटही सावरले आहे. पावसाळ्यात चमचमीत खाण्याचे दिवस आले असून, खाद्यतेलाच्या स्वस्ताईने त्यात पुन्हा भर पडली आहे.

काही वर्षांमध्ये करडईचे उत्पादन घेऊन बोरी येथील घाण्यातून तेल काढून आणत होतो. हे तेल वर्षभर पुरायचे; मात्र आता करडईच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून करडईचे उत्पादन घेणे बंद केले आहे. परिणामी, बाजारपेठेतून दर महिन्याला सोयाबीनचे तेल खरेदी करावे लागत आहे.

- लक्ष्मण वैद्य, शेतकरी.

परभणी तालुका व परिसरातील तेल काढण्याचे घाणे बंद झाले आहेत. तेलासाठी आवश्यक शेतीमाल उत्पादित करताना शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतेही बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशाेधित केले नाही. त्यामुळे तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेणे बंद केले आहे.

- नरसिंग ठेंबरे, शेतकरी

शेंगदाणा, सूर्यफूल उत्पादन घटले

तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलाबरोबरच करडईचे उत्पादन गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घटले आहे. कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्हा व परिसरातील तेल उद्योगही बंद पडले आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलाचे दर नियंत्रणात येऊ शकतात.

राज्य शासन व कृषी विभागाने तेल वर्गीय पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यात तेलवर्गीय पिकांसाठी कोणतेही व्हिजन सध्या तरी कृषी विभागाकडे दिसून येत नाही.