शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नियोजनाअभावी मच्छीमाराची जाळी राहीली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:19 IST

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृग नक्षत्रापासुन २३ आँक्टोंबर पर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील यापूर्वी कोरडे पडलेले ...

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी मृग नक्षत्रापासुन २३ आँक्टोंबर पर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील यापूर्वी कोरडे पडलेले सर्वच नदी, नाले भरून वाहीले. यामुळे सेलू तालूका पाणीदार झाला आहे. महसुल विभागाच्या माहीती नुसार जुन ते २३ आँक्टोंबर २०२० पर्यंत सरासरी ८३७ मी.मी ओलांडून त्यापेक्षा अधिक म्हणजे १०७४ मी.मी.असा विक्रमी पाऊस झाला आहे. आजमित्तीस सेलू तालुक्यातील १ सिंचन तलाव ,५ पाझर तलाव व ५ गाव तलाव अशा एकुण ११ तलावात ८५ टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे आँक्टोबंर महिन्यापासून या लघुतलावात मत्स्यव्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया झाली असती तर मत्स्यव्यवसायीकांना आर्थिक आधार मिळाला असता. तसेच शासनालाही महसूल प्राप्ती झाली असती. फेब्रुवारी महिना आला तरीही याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. केवळ नियोजनाच्या अभावामुळे हि बाब प्रशासनाकडून दुर्लक्षित राहीली हे प्रकर्षाने समोर आले. त्यामुळे या ११ लघु तलावातील मत्स्य व्यवसायावर आपली उपजीविका भागविणाऱ्या मत्स्य व्यावसायीकांवर केवळ प्रशासनाच्या नियोजनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.

असा आहे तलावातील पाणीसाठा

उपविभागीय जलसंधारण कार्यायलाच्या माहीतीनुसार सि़चन तलाव- नरसापुर तलावात ५९४ टि.सी.एम.(१०० टक्के),पाझर तलाव : देवगांव २७८ टिसीएम (९६),प्रिंपरी बु. २६१ टिसीएम (१००),गिरगांव १८४ टिसीएम (८५),तांदुळवाडी १७४टिसीएम (७५),वालूर १६ टिसीएम (२५)

तसेच गाव तलाव : हादगांव खु.१९ टिसीएम (८८),तांदूळवाडी ३८ टिसीएम (८६),गिरगांव ३४ टिसीएम (८९),नरसापुर २८ टिसीएम (८७),आरसड सांवगी २० टिसीएम (८५ टक्के)प्रमाणे पाणीसाठा उपलब्ध आहे.

रिक्त पदामुळे कामे संथगतीने

जिंतुर उपविभागात जिंतूर ,सेलू, पाथरी व मानवत अशा चार तालुक्याचा सामावेश आहे. येथे एक उपविभागीय अधिकारी व पाच कनिष्ठ अभियंता असे सहा पदे मंजूर असतांना केळव एकच कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे. चार कनिष्ठ अभियंत्याचे पद रिक्त आहेत. तर परभणी येथील शाखा अभियंता टि.के.मुरकुटे यांचेकडे येथील उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे.त्यामुळे या विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. परीणामी कामाची गती मंदावली असल्याचे दिसुन येत आहे.