शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:10 IST

पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.

परभणी : पावसाने दिलेल्या सलग २५ दिवसांच्या खंडामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम हा शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील ७ लाख शेतकऱ्यांची या हंगामावर भिस्त असते. हे शेतकरी दरवर्षी खरीप हंगामात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करतात. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाकडून ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. कृषी विभागाने केलेल्या नियोजनावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. जून, जूलै व आॅगस्ट या तीन महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसावर खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद ही पिके बहरली; परंतु, त्यानंतर पावसाने दिलेल्या खंडाने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे उडीद व मूग ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार ही खरीप हंगामातील २ लाख ११ हजार ७७२ हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीन व १ लाख ५८ हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेल्या कापूस लागवडीवर अवलंबून होती; परंतु, जिल्ह्यामध्ये २० व २१ आॅगस्टनंतर दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बहरात आलेली साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कापूस ही पिके धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिकांची परिस्थिती नाजूक झाली असून, कृषी विभागाने पंनचामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

नैसर्गिक संकटात सापडला शेतकरी जिल्ह्यात १ लाख ५८ हजार ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सध्या कापूस पीक बहरले आहे. कृषी विभागाकडून बोंडअळीच्या संकटाला तोंड देण्यासाठी क्रॉपसॅप अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली; परंतु, या पाहणीत अधिकाऱ्यांना विदारक चित्र दिसून आले. याबाबत कृषी विभागाने कसोटीचे प्रयत्न करीत बोंडअळीस नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु, पावसाच्या खंडामुळे कापूस पिकावर रोगाचा प्रादूर्भाव ‘जैसे थे’ असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे.  

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी