शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

२४ तासात उघडू शकतात येलदरी धरणाचे दरवाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:50 IST

नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाचा सावधानतेचा इशारा

ठळक मुद्दे८६ टक्के पाणीसाठा असून आवक सुरु आहे

येलदरी- जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पामध्ये ८६ टक्के पाणीसाठा झाला असून या प्रकल्पाचे दरवाजे उघडून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.

परतीचा पाऊस परतेना ! पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी येलदरी प्रकल्पात दाखल होत असून सोमवारी या धरणामध्ये ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे.९३४ दलघमी क्षमता असलेल्या येलदरी धरणामध्ये सध्या ८१८ दलघमी पाणीसाठा झाला असून त्यात ६९३ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८५.६९ टक्के एवढी आहे. या धरणाच्या वरील बाजुस असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेता येत्या २४ तासात कोणत्याही क्षणी येलदरी धरणाचे दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णा नदीला पूर येऊ शकतो. नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. बिराजदार यांनी दिला आहे.

येलदरी धरणाच्या पाण्यावर विजेची निर्मिती केली जाते. त्यामुळे दाखल होणारे पाणी सुरुवातीला वीज निर्मिती केंद्रातून सोडले जाईल. त्यानांतर पाण्याची आवक आणखी वाढल्यास मुख्य दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरणात सद्यस्थितीला होणारी पाण्याची आवक लक्षात घेता येत्या २४ तासात मुख्य दरवाजे उघडून पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणparabhaniपरभणीRainपाऊसriverनदी