शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

जिल्हा कचेरी वाहनांची गर्दी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण ...

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. नानलपेठ कॉर्नरपासून ते शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता एकेरी वाहतुकीचा असताना या मार्गावर दुहेरी वाहतूक होत आहे. वाहतूक शाखेकडून मात्र नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत.

ग्रामीण भागात विजेचा समस्या वाढल्या

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: कृषिपंपांना दिली जाणारी वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पिकांना देणे पाणी शक्य होत नाही. त्यामुळे महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर

परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियमसमोरील बचत भवनच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. तळमजला आणि त्यावरील दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून, सध्या तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

पीकविम्याचा प्रश्न रखडलेला

परभणी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अजूनही कंपनीने शेतकऱ्यांना परत केला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, प्रशासन इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करूनही शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित रहावे लागत आहे. कृषी विभागाने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था

परभणी : शहरातील सुपरमार्केट ते मोठा मारुती मंदिर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कारेगाव रोड भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांसाठी हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना मात्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. त्यामुळे शेतशिवारातून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.