शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

जिल्हा कचेरी वाहनांची गर्दी हटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण ...

शहरात विरुद्ध बाजूने वाहतूक

परभणी : शहरातील बाजारपेठ भागात विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात असून, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. नानलपेठ कॉर्नरपासून ते शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता एकेरी वाहतुकीचा असताना या मार्गावर दुहेरी वाहतूक होत आहे. वाहतूक शाखेकडून मात्र नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत.

ग्रामीण भागात विजेचा समस्या वाढल्या

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषत: कृषिपंपांना दिली जाणारी वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही पिकांना देणे पाणी शक्य होत नाही. त्यामुळे महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर

परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियमसमोरील बचत भवनच्या जागेत नवीन नाट्यगृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. तळमजला आणि त्यावरील दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून, सध्या तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

पीकविम्याचा प्रश्न रखडलेला

परभणी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अजूनही कंपनीने शेतकऱ्यांना परत केला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, प्रशासन इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करूनही शेतकऱ्यांना विमा परताव्यापासून वंचित रहावे लागत आहे. कृषी विभागाने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था

परभणी : शहरातील सुपरमार्केट ते मोठा मारुती मंदिर या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, कारेगाव रोड भागातील अनेक वसाहतींमधील नागरिकांसाठी हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना मात्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला असून, पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. त्यामुळे शेतशिवारातून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.