शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

५० दिवसांत चारवेळा जिल्हा रुग्णालयात लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:20 IST

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागातील दुसऱ्या मजल्यावरील जिन्यावर ठेवण्यात आलेल्या लाकडी साहित्यास ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० ...

परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागातील दुसऱ्या मजल्यावरील जिन्यावर ठेवण्यात आलेल्या लाकडी साहित्यास ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरातील धोबी घाट भागात आग लागली. या दोन्ही घटनांमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आता या घटनांची चौकशी प्रशासनाकडून करण्यात आली आहे; परंतु, यापूर्वी दोन वेळा या रुग्णालयात आग लागल्याच्या घटना घडल्यानंतरही त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. १७ डिसेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजता, त्यानंतर ३ जानेवारीही जिल्हा रुग्णालयात आग लागली होती. यावेळीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे या दोन्ही घटनांवर चर्चा झाली नाही; परंतु, आगीच्या या घटना का घडल्या, याचा शोध घेतला गेला नाही. परिणामी भविष्यात अशी एखादी घटना घडल्यास तातडीने काय उपाययोजना कराव्यात, याची समयसूचकता प्रशासनाला राहिलेली नाही. ९ जानेवारी रोजी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून १० चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. देशभरात हा विषय चर्चेला आला. या पार्श्वभूमीवर ६ व ७ फेब्रुवारी रोजी परभणीतील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने चौकशीच्या अनुषंगाने समित्यांची स्थापना केली आहे.

समित्यांची सदस्य नियुक्तीच वादाच्या भोवऱ्यात

जिल्हा रुग्णालयात ६ फेब्रुवारी रोजी आग लागल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणाकडून त्रुटी राहिल्या? त्याला जबाबदार कोण? संबंधितांवर काय कारवाई करावी? याशिफारसी करणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या कार्यालयाची चौकशी करावयाची आहे, त्याच कार्यालयाचे प्रमुख म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे चौकशी समितीचे सदस्य आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. के. डाके हेही समितीचे सदस्य आहेत. तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे समितीचे सदस्य सचिव आहेत. आता जिल्हा रुग्णालयातील कारभाराची त्याच रुग्णालयातील अधिकारी चौकशी करणार असल्याने समितीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. खरे तर रुग्णालयाबाहेरील त्रयस्थ अधिकाऱ्यांना समितीत नियुक्त करणे आवश्यक होते; परंतु, केवळ अध्यक्ष डॉ. कुंडेटकर व मनपा उपायुक्त गायकवाड हेच दोन जिल्हा रुग्णालयाबाहेरील अधिकारी आहेत. त्यामुळे या समितीकडून नि:पक्ष चौकशी होईल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.