शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:18 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला ...

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावरील पोर्टलमधील कोरोनाबाधित मयत रुग्णांच्या आकडेवारीत फरक निर्माण झाला आहे. राज्याच्या पोर्टलवर रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेताना प्रशासनातच गफलत होत असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाने शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग केले असून, त्यानुसार त्या त्या भागातील कोरोनाबाधित मयत रुग्णांची नोंद घेतली जाते. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या वतीने दररोज जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीत आणि राज्यस्तरावर प्रकाशित होणाऱ्या पोर्टलवरील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदीत तफावत येत आहे.

१८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने एकूण १ हजार १५३ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेतली आहे, तर याच दिवशी राज्यस्तरावरून प्रकाशित झालेल्या प्रेसमध्ये जिल्ह्यात ८१२ आणि मनपाअंतर्गत ४५९, अशा १ हजार २७१ रुग्णांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या ११८ रुग्णांची नोंद जिल्हास्तरावर घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

वार रूममधून केवळ नियंत्रण

कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदी घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर वार रूम तयार करण्यात आली आहे. या वाररूममधून मृत्यूच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे हीच आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वार रूममधून होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमधून ही माहिती घेतली जाते. कधी माहिती मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे आकडेवारीत फरक येत आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात मयत रुग्णांची आकडेवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत जाहीर केली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी घेतली जाते. त्यामुळे दोन्ही बाबींचा फरक येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरी भागात सर्वाधिक मृत्यू

शहरी भागात महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मनपा हद्दीत ४५९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद राज्यस्तरावरील पोर्टलवर घेण्यात आली आहे.