शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

धक्कादायक ! चारठाण्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:36 IST

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी एका इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्यादुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

चारठाणा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार उरकले जात आहेत. १६ ऑगस्ट रोजी एका इसमाचे निधन झाले. मात्र या इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्याचा प्रकार समोर आला.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ ऑगस्ट रोजी रेखा रुपचंद राठोड या साठ वर्षीय इसमाचे निधन झाले. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अग्नी देताना पावसाची रिपरिप सुरु झाली. पावसाचे पाणी अग्निवर पडत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत अग्नि देवूनही हा मृतदेह व्यवस्थित जळाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जावून कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

दरम्यान, या मृतदेहाला पुन्हा अग्नि देण्यात आला. विशेष म्हणजे ही अग्नी देताना २५ लिटर डिझेल, ५ लिटर पेट्रोल, चारचाकी गाडीचे दहा टायर टाकल्यानंतर हा मृतदेह पूर्णत: जळाला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नदीकाठी उघड्यावर मृतदेह जाळावा लागत आहे. पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास हलअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने गंभीरतेने पाहत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनताजिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, राजकारणासाठी हे गाव  तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सहाजिकच या गावामध्ये लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आहेत. या गावातील लोकप्रतिनिधींनी अनेक पदेही भूषवून जिल्ह्यात राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र स्वातंत्र्याच्या ७४  वर्षानंतरही चारठाणा येथील बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी या लोकप्रतिनिधींना  अजूनही वेळ भेटलेला नाही. तसेच या समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावाही करण्यात आला नाही. त्यामुळे बंजारा समाज बांधवांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू