शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! चारठाण्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:36 IST

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी एका इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्यादुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

चारठाणा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार उरकले जात आहेत. १६ ऑगस्ट रोजी एका इसमाचे निधन झाले. मात्र या इसमावर अंत्यसंस्कार करताना बंजारा समाजबांधवांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्याचा प्रकार समोर आला.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील बंजारा समाजबांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ ऑगस्ट रोजी रेखा रुपचंद राठोड या साठ वर्षीय इसमाचे निधन झाले. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. अग्नी देताना पावसाची रिपरिप सुरु झाली. पावसाचे पाणी अग्निवर पडत असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत अग्नि देवूनही हा मृतदेह व्यवस्थित जळाला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑगस्ट रोजी घटनास्थळी जावून कुटुंबियांनी पाहणी केली. तेव्हा हा मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाल्याचे आढळून आले.

दरम्यान, या मृतदेहाला पुन्हा अग्नि देण्यात आला. विशेष म्हणजे ही अग्नी देताना २५ लिटर डिझेल, ५ लिटर पेट्रोल, चारचाकी गाडीचे दहा टायर टाकल्यानंतर हा मृतदेह पूर्णत: जळाला. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नदीकाठी उघड्यावर मृतदेह जाळावा लागत आहे. पावसाळ्यात एखादा व्यक्ती मृत्यू पावल्यास हलअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने गंभीरतेने पाहत स्मशानभूमीला जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींची उदासीनताजिंतूर तालुक्यातील चारठाणा सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, राजकारणासाठी हे गाव  तालुक्याचे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सहाजिकच या गावामध्ये लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आहेत. या गावातील लोकप्रतिनिधींनी अनेक पदेही भूषवून जिल्ह्यात राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र स्वातंत्र्याच्या ७४  वर्षानंतरही चारठाणा येथील बंजारा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी या लोकप्रतिनिधींना  अजूनही वेळ भेटलेला नाही. तसेच या समाजाच्या स्मशानभूमीचा मार्ग निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून शासन, प्रशासन दरबारी पाठपुरावाही करण्यात आला नाही. त्यामुळे बंजारा समाज बांधवांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी समाजबांधवातून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू