शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

स्मशानभूमीसाठी रस्ता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद ...

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्यांना रेफर केले जात आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

परभणी : तालुक्यातील सोन्ना, ब्राह्णमगाव, मांडाखळी, बाभळगाव, उजळंबा शिवारात २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गजानन गमे, मारोती कदम, सुधाकर कोंडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

परभणी : लातूर जिल्ह्यातील कोपरा येथील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. या घटनेतील आरोपींवर शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा संयोजक माऊली कोपरे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे रबी हंगामातील ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

२०० मशीन दुरुस्तीअभावी पडून

परभणी : येथील एसटी महामंडळाच्या पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगारातील २०० ईटीआय मशीन दुरुस्तीअभावी मुंबई येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

दिव्यांगांची परभणीत हेळसांड सुरूच

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणीत दिव्यांगांची हेळसांड सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे.

परभणी बसस्थानकात चोऱ्यांमध्ये वाढ

परभणी : येथील बसस्थानकामध्ये अपुरी सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षा रक्षक नसल्याने चोऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देणे गरजेचे आहे.