शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

स्मशानभूमीसाठी रस्ता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद ...

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्यांना रेफर केले जात आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

परभणी : तालुक्यातील सोन्ना, ब्राह्णमगाव, मांडाखळी, बाभळगाव, उजळंबा शिवारात २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गजानन गमे, मारोती कदम, सुधाकर कोंडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

परभणी : लातूर जिल्ह्यातील कोपरा येथील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. या घटनेतील आरोपींवर शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा संयोजक माऊली कोपरे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे रबी हंगामातील ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

२०० मशीन दुरुस्तीअभावी पडून

परभणी : येथील एसटी महामंडळाच्या पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगारातील २०० ईटीआय मशीन दुरुस्तीअभावी मुंबई येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

दिव्यांगांची परभणीत हेळसांड सुरूच

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणीत दिव्यांगांची हेळसांड सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे.

परभणी बसस्थानकात चोऱ्यांमध्ये वाढ

परभणी : येथील बसस्थानकामध्ये अपुरी सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षा रक्षक नसल्याने चोऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देणे गरजेचे आहे.