शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

बियाण्यांसाठी केवळ १६७ शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST

देवगांवफाटा: खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्ज एक योजना अनेक या तत्त्वावर महा डीबीटी पोर्टलवर बियाण्यांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदत २० ...

देवगांवफाटा: खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्ज एक योजना अनेक या तत्त्वावर महा डीबीटी पोर्टलवर बियाण्यांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदत २० मे होती. परंतु, तालुक्यातील केवळ १६७ शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे २४ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिली.

खरीप हंगामासाठी शासनाच्या महा डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकाखाली बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजनेची अंतिम मुदत २० मे होती.या मुदतीत सेलू तालुक्यातील ४७ गावामधून १६७ अशी अत्यल्प नोंदणी झालेली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कमी नोंदण्या आल्याने या योजनेला शासनाने आणखीन ४ दिवसांची मुदतवाढ दिली असून २४ मे पर्यंत शेतकऱ्यांना आता नोंदणी करता येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरिपासाठी सोयाबीन,मूग, उडीद, मका, बाजरी, इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.परंतु अंतिम मुदतीच्या आत सेलू तालुक्यात केवळ १६७ शेतकऱ्यांनी नोंदण्या केल्या. यामुळे शेतकरी उदासीन का जनजागृतीचा आभाव हे मात्र समजू शकत नाही. नोंदणीमध्ये वाढ व्हावी, यासाठी या योजनेला पुन्हा चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

जनजागृतीची गरज

सेलू तालुक्यात गतवर्षी ७० हजार शेतकरी यांनी पीकविमा भरला होता. त्या तुलनेत अनुदान तत्त्वावर बियाणे मिळण्यासाठी केवळ १६७ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. आत्ता चार दिवसात किती वाढ होणार हे समोर येईल.

◼️८ च्या वर नोंदणी झालेले सहा गावं...

सेलू तालुक्यातील ४७ गावातील शेतकऱ्यांनी अनुदान तत्वावर बियाणेसाठी नोदणी केली आहे. यामध्ये केवळ सहा गावातील संख्या ८ च्या वर आहे.तर ४१ गावात १ किंवा दोन नोंदणी आहे. ती सहा गावे अशी वाई (३०),डिग्रस जहाँगीर (१६),पिंपळगाव गोसावी (११),नांदगाव (११), कुपटा (९),बोथ (८)

◼️शासनाने लकी ड्रॉ पध्दतीने शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाण्यांसाठी नोंदणी सुरू केली या योजनेचा सेलू तालुक्यातील जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे.

आनंद कांबळे

तालुका कृषी आधिकारी,सेलू