शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

घसरते दर अन् दुष्काळ नित्यच; परभणी जिल्ह्यात चार दिवसांआड एक बळीराजा जीवन संपवतोय

By मारोती जुंबडे | Updated: January 13, 2024 18:55 IST

दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शासन प्रशासनाकडून केवळ योजनांची जंत्री राबविली जात आहे. त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही.

परभणी : रजाकाराच्या अन्याय-अत्याचारातून मराठवाडा मुक्त होऊन ७० वर्षे झाली; परंतु दुष्काळाच्या कचाट्यातून मात्र परभणी मुक्त होत नसल्याने या भागाचे वाळवंट होण्याची वेळ आली आहे. राजकीय, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्यातील नेतेमंडळी व जनतेने पुन्हा एकदा एकत्र येऊन दुष्काळाविरुद्ध लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, जगाचा पोशिंदा म्हणून समजल्या जाणारा बळीराजा चार दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याची विदारक स्थिती जिल्ह्यात आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावर आवश्यक ते बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.

सुजलाम् सुफलाम् असलेल्या या जिल्ह्यातून गोदावरी, दुधना, करपरा, पूर्णा या नद्या वाहतात. या नद्या जिल्ह्याच्या जीवनवाहिनी आहेत. त्या अप्रवाहित झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. या नद्यांमधील वाळूचा बेसुमार उपसा केला जातो. त्याला आर्थिक हितसंबंधातून प्रतिबंध घातला जात नाही. ज्या नद्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांची शेती आहे. ते शेतकरीही बघ्याची भूमिका घेतात. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शेखी मिळविणारे नेते या वाळूमाफियांचे संरक्षक बनतात. परिणामी, या नद्यांमध्ये थेंबभरही पाणी जमा होत नाही. त्यामुळे निसर्गाने दिले; परंतु मानवानेच हातचे सोडून दिले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे पडणाऱ्या पावसाचे पाणी आडवून ठेवण्यात व जमिनीत मुरवण्यात जिल्ह्याला अपयश आले. याशिवाय माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणवगळता जिल्ह्यात अन्य राजकीय नेतेमंडळींना वाहून जाणारे पाणी थांबविण्याच्या दृष्टिकोनातून फारसा प्रयत्न करता आला नाही. त्यातच शासन, प्रशासनाकडून योजनांची जंत्री शेतकऱ्यांसाठी राबविली जाते. मात्र, त्याचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांसाठी होताना दिसून येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढीदेखील कमाई काही दिवसांपासून होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासन व प्रशासनाने ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी संपविले जीवनपाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाला नऊ वर्षे पूर्ण झाली. शेतकऱ्यांचे उत्पन्न या काळात दुप्पट झाले की नाही हा मंथनाचा विषय आहे, तरी दुसरीकडे मात्र जगाचा पोशिंदा म्हणून समजला जाणारा बळीराजा चार दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याचे विदारक स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभराच्या काळात ९९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक जुलै महिन्यात १४ जणांनी, तर ऑक्टोबर महिन्यात १३ जणांनी गळफास व विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

नैसर्गिक संकटे अन् घसरते शेतमालाचे भावपरभणी जिल्ह्यातील जमीन ही सुपीक आणि काळी कसदार असली तरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या आर्थिक चक्र बदलून टाकले आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो; परंतु ही पिके काढणीला आलीच की अतिवृष्टी, सततचा पाऊस, वादळ वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. दुसरीकडे यंदा तर ३२ टक्के पावसाची तूट निर्माण झाल्याने भीषण स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दुसरीकडे १२ हजार रुपये क्विंटल सोयाबीन तर १० हजार रुपये क्विंटल कापसाचे भाव असताना सध्या हे शेतीमालाचे भाव कापूस ७ हजार रुपये, तर सोयाबीन ४५०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटे आणि घसरते शेतमालाचे भाव शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांची बिकट अवस्थाजिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना शासन प्रशासनाकडून केवळ योजनांची जंत्री राबविली जात आहे. त्याचा कोणताही थेट फायदा शेतकऱ्यांना होत नाही. परिणामी, गतवर्षी जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपले होते. याचा अर्थ दर पाच दिवसाला एका शेतकरी मृत्यूला कवटाळत होता; परंतु यंदा गतवर्षीपेक्षा ही भीषण परिस्थिती जिल्ह्यात उद्भवली आहे. सरासरीपेक्षा ३२ टक्के पाऊस कमी झाल्याने सध्या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे, अशा असताना शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचेल अशी कोणतीही मदत राज्य शासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षात ९९ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. याचा अर्थ चार दिवसाला एक शेतकरी गळफास घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याparabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र