शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 14:11 IST

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने मात्र काही मंडळांना मदतीपासून वगळले आहे.जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. संपूर्ण जिल्हाभरात ही परिस्थिती असताना प्रशासनाने मात्र काही मंडळांना मदतीपासून वगळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली असून, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सकसकट मद्त द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यात चार ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परभणी- गंगाखेड रस्त्यावर पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात शेतकरी आर्थिक दृष्टीने खचला असताना शासन, प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही. याविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परभणी तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी माजी सभापतीे गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, मधुकरराव लाड, तुकाराम गिराम, राजाराम कच्छवे, भास्कर कच्छवे, मारोतराव गमे, अंगद घाटगे, श्रीकृष्ण घाटगे, रवि कांबळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे गंगाखेड रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. दोन तास आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी