शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

मरण झाले स्वस्त, महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून ...

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून जातात. या सर्व मार्गांवर जड वाहनांसह अन्य वाहनांची २४ तास वर्दळ असते. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काहींचे काम प्रगतिपथावर आहे. परभणी-नांदेड या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या सर्वच महामार्गांवर काही ठराविक ठिकाणे अशी आहेत, जेथे किरकोळ अपघात तसेच मोठे अपघात नेहमीच घडतात. कोरोनाच्या पूर्वी आणि कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. मागील काही दिवसांत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू काही कमी झालेले नाहीत. यामुळे वाहनधारकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ ४२ ४७ २५

२०१९ ३८ ३६ १९

२०२० ३१ १२ २५

२०२१ मे पर्यंत १४ ०५ ११

लाॅकडाऊनमध्ये अपघात सुरूच

मागील वर्षी २०२० व सध्या २०२१ मेपर्यंत ४५ अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये हे अपघात झाले आहेत.

पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू

जिंतूर ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मागील वर्षभरात रस्त्याने पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जड वाहनांसह किरकोळ छोट्या वाहनांच्या अपघातात रस्त्याने पायी जाणाऱ्या ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे पायी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

मृतांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक

राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर झालेल्या कोरोना काळातील आणि त्यापूर्वीच्या अपघातांमध्ये मृत्यू झालेले नागरिक सर्वच वयोगटातील असल्याचे दिसून येते. यात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

देवगाव फाट्याजवळील करपरा नदी पूल, चारठाणा वळण रस्ता, नागठाणा पाटी, ताडबोरगाव, परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा, आरळ, तेलगाव, परभणी-जिंतूर रस्ता, देवगाव फाटा-पाथरी रस्ता, जिंतूर - सेनगाव रस्ता या ठिकाणी वाहनधारकांनी काळजी घेत वाहने चालविणे गरजेचे आहे.

महामार्ग विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३ प्रमुख महामार्गांवर १५० मृत्युंजय दूत नेमण्यात आले आहेत. हे दूत एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची माहिती त्वरित महामार्ग पोलिसांना देतात. यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होत आहे. वाहन चालकाने वाहनावर नियंत्रण राहील, अशा पद्धतीने वाहने चालवावीत. यामुळे अपघात होणार नाहीत.

- त्र्यंबक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस पथक, जिंतूर.