शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

मरण झाले स्वस्त, महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून ...

परभणी जिल्ह्यातून कल्याण-निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग जातो. यासह औरंगाबाद-नांदेड हाही प्रमुख मार्ग आहे. यासह सात ते आठ राज्यमार्ग जिल्ह्यातून जातात. या सर्व मार्गांवर जड वाहनांसह अन्य वाहनांची २४ तास वर्दळ असते. यातील काही महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे तर काहींचे काम प्रगतिपथावर आहे. परभणी-नांदेड या महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या सर्वच महामार्गांवर काही ठराविक ठिकाणे अशी आहेत, जेथे किरकोळ अपघात तसेच मोठे अपघात नेहमीच घडतात. कोरोनाच्या पूर्वी आणि कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले होते. मागील काही दिवसांत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू काही कमी झालेले नाहीत. यामुळे वाहनधारकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ ४२ ४७ २५

२०१९ ३८ ३६ १९

२०२० ३१ १२ २५

२०२१ मे पर्यंत १४ ०५ ११

लाॅकडाऊनमध्ये अपघात सुरूच

मागील वर्षी २०२० व सध्या २०२१ मेपर्यंत ४५ अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. पहिल्या तसेच दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये हे अपघात झाले आहेत.

पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू

जिंतूर ते देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मागील वर्षभरात रस्त्याने पायी चालणाऱ्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जड वाहनांसह किरकोळ छोट्या वाहनांच्या अपघातात रस्त्याने पायी जाणाऱ्या ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे पायी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

मृतांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक

राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गावर झालेल्या कोरोना काळातील आणि त्यापूर्वीच्या अपघातांमध्ये मृत्यू झालेले नागरिक सर्वच वयोगटातील असल्याचे दिसून येते. यात तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

देवगाव फाट्याजवळील करपरा नदी पूल, चारठाणा वळण रस्ता, नागठाणा पाटी, ताडबोरगाव, परभणी-नांदेड मार्गावरील झिरो फाटा, आरळ, तेलगाव, परभणी-जिंतूर रस्ता, देवगाव फाटा-पाथरी रस्ता, जिंतूर - सेनगाव रस्ता या ठिकाणी वाहनधारकांनी काळजी घेत वाहने चालविणे गरजेचे आहे.

महामार्ग विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३ प्रमुख महामार्गांवर १५० मृत्युंजय दूत नेमण्यात आले आहेत. हे दूत एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास त्याची माहिती त्वरित महामार्ग पोलिसांना देतात. यामुळे जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित उपचार मिळण्यास मदत होत आहे. वाहन चालकाने वाहनावर नियंत्रण राहील, अशा पद्धतीने वाहने चालवावीत. यामुळे अपघात होणार नाहीत.

- त्र्यंबक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस पथक, जिंतूर.