शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

चार कोराेना बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

परभणी : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग घटलेला असून शनिवारी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. मागील ...

परभणी : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग घटलेला असून शनिवारी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता निर्माण झाली आहे.

मागील तीन-चार आठवड्यांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला ; परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अद्यापही कमी झाले नाही. शनिवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात एक, आयटीआय हॉस्पिटलमधून २ आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये २ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.

नवीन रुग्णांचे प्रमाण मात्र लक्षणीयरीत्या घटले आहे. आरोग्य विभागाला ५८६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ३५२ अहवालांमध्ये २२ आणि रॅपिड टेस्टच्या २३४ अहवालांमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५० हजार १५१ झाली असून, त्यापैकी ४७ हजार ५९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २४७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १ हजार ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत.

४६२ रुग्णांची कोरोनावर मात

शनिवारी दिवसभरात ४६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली.