शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

१८ हजार हेक्टरवरील पिकांना मिळेना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

गंगाखेड : यावर्षी झालेल्या पावसामुळे पैठण व माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, या दोन्ही धरणांतील पाणी रब्बी ...

गंगाखेड : यावर्षी झालेल्या पावसामुळे पैठण व माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, या दोन्ही धरणांतील पाणी रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याचे अद्यापपर्यंत नियोजन झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्‍टरवरील पिके पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे गोदावरी नदी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. तालुक्यातील मैराळ सावंगी, गोंडगाव, चिंचटाकळी, ब्राह्मणवाडी, खळी तांडा, खळी, महातपुरी, दुसलगाव, अंबरवाडी, मुळी, धारखेड, नागठाणा आदी शिवारातील १८ हजार हेक्टर शेत जमिनीतील रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडणे गरजेचे आहे. मात्र, यावर्षी पैठण आणि माजलगावचे धरण शंभर टक्के भरले आहे. या पाण्याचा फायदा अद्यापही गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. विशेष म्हणजे माजलगाव व पैठण धरणातील पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याबाबत कुठलेही नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीला लाभक्षेत्रातील १८ हजार हेक्‍टर शेतजमिनीवरील पिकांसाठी पाण्याची गरज आहे. मात्र, हे पाणी अद्याप सोडण्याबाबत कोणतेही नियोजन न झाल्याने उन्हाळी हंगामातील भुईमूग, मका, भाजीपाला तसेच रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माजलगाव व पैठण धरण प्रशासनाने तातडीने पावले उचलत गोदावरी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.