शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पावसाअभावी पिके संकटात; महिला शेतकऱ्याने पाच एकर कापसावर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:42 IST

तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे.

पाथरी (परभणी ) : तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे. पाण्याअभावी सोयाबीन करपून गेले असून कापूस पूर्णपणे सुकला आहे. या परिस्थितीमुळे बाभळगाव येथील एका महिला शेतकऱ्याने वैतागून ५ एकरवरील कापूस पिकावर नांगर फिरवला. 

बाभळगाव मंडळात यावर्षी कमी पाऊस आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. नंतर थोडा फार पाऊस पडल्याने खरिपाच्या आशा जिवंत झाल्या. कापूस सोयाबीन ही दोन प्रमुख पिके तालुक्यात घेतली जातात. सोयाबीन चा पेरा १४ हजार हेक्टर तर कापसाचा पेरा १८ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामातील पिकांची अवस्था चांगली आहे असे वाटत असताना गेल्या २५ दिवसापासून पावसाने पूर्णतः खंड दिला आहे. पिके करपून आणि सुकून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस लांबला, तर कापूस ही सुकू लागला. त्यामुळे बोंड आणि पाते तसेच कापसाचे फुल पाने गळू लागले आहेत.

अशा परिस्थितीने त्रस्त होऊन बाभळगाव येथील महिला शेतकरी शोभा विठ्ठल ठोंबरे यांनी बाभळगाव येथील गट न २२९  मध्ये ५ एकर कपाशीची लागवड केली होती. पाऊसाचा दीर्घ खंड पडल्याने त्यांनी आज ५ एकर कापसावर नांगर फिरवला. या भागात सर्वच खरीप हंगामातील पिकांची वाईट अवस्था निर्माण झाली आहे, या मुळे याही वर्षी शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस