शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके संकटात; महिला शेतकऱ्याने पाच एकर कापसावर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:42 IST

तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे.

पाथरी (परभणी ) : तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे. पाण्याअभावी सोयाबीन करपून गेले असून कापूस पूर्णपणे सुकला आहे. या परिस्थितीमुळे बाभळगाव येथील एका महिला शेतकऱ्याने वैतागून ५ एकरवरील कापूस पिकावर नांगर फिरवला. 

बाभळगाव मंडळात यावर्षी कमी पाऊस आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. नंतर थोडा फार पाऊस पडल्याने खरिपाच्या आशा जिवंत झाल्या. कापूस सोयाबीन ही दोन प्रमुख पिके तालुक्यात घेतली जातात. सोयाबीन चा पेरा १४ हजार हेक्टर तर कापसाचा पेरा १८ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामातील पिकांची अवस्था चांगली आहे असे वाटत असताना गेल्या २५ दिवसापासून पावसाने पूर्णतः खंड दिला आहे. पिके करपून आणि सुकून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस लांबला, तर कापूस ही सुकू लागला. त्यामुळे बोंड आणि पाते तसेच कापसाचे फुल पाने गळू लागले आहेत.

अशा परिस्थितीने त्रस्त होऊन बाभळगाव येथील महिला शेतकरी शोभा विठ्ठल ठोंबरे यांनी बाभळगाव येथील गट न २२९  मध्ये ५ एकर कपाशीची लागवड केली होती. पाऊसाचा दीर्घ खंड पडल्याने त्यांनी आज ५ एकर कापसावर नांगर फिरवला. या भागात सर्वच खरीप हंगामातील पिकांची वाईट अवस्था निर्माण झाली आहे, या मुळे याही वर्षी शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस