शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पावसाअभावी पिके संकटात; महिला शेतकऱ्याने पाच एकर कापसावर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:42 IST

तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे.

पाथरी (परभणी ) : तीन आठवड्याहून अधिक काळापासून तालुक्यात पाऊस नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः धोक्यात आला आहे. पाण्याअभावी सोयाबीन करपून गेले असून कापूस पूर्णपणे सुकला आहे. या परिस्थितीमुळे बाभळगाव येथील एका महिला शेतकऱ्याने वैतागून ५ एकरवरील कापूस पिकावर नांगर फिरवला. 

बाभळगाव मंडळात यावर्षी कमी पाऊस आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या उशिरा झाल्या. नंतर थोडा फार पाऊस पडल्याने खरिपाच्या आशा जिवंत झाल्या. कापूस सोयाबीन ही दोन प्रमुख पिके तालुक्यात घेतली जातात. सोयाबीन चा पेरा १४ हजार हेक्टर तर कापसाचा पेरा १८ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामातील पिकांची अवस्था चांगली आहे असे वाटत असताना गेल्या २५ दिवसापासून पावसाने पूर्णतः खंड दिला आहे. पिके करपून आणि सुकून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस लांबला, तर कापूस ही सुकू लागला. त्यामुळे बोंड आणि पाते तसेच कापसाचे फुल पाने गळू लागले आहेत.

अशा परिस्थितीने त्रस्त होऊन बाभळगाव येथील महिला शेतकरी शोभा विठ्ठल ठोंबरे यांनी बाभळगाव येथील गट न २२९  मध्ये ५ एकर कपाशीची लागवड केली होती. पाऊसाचा दीर्घ खंड पडल्याने त्यांनी आज ५ एकर कापसावर नांगर फिरवला. या भागात सर्वच खरीप हंगामातील पिकांची वाईट अवस्था निर्माण झाली आहे, या मुळे याही वर्षी शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस