शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

परभणी जिल्ह्यात १९ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:23 IST

गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांचा मोठा हातभार लागला आहे. त्या पाठोपाठ यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी १७८३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ११ मेपर्यंत २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.परभणी हा कृषी व्यवसायावर अवलंबून असलेला जिल्हा आहे. येथील आर्थिक उलाढाल कृषी व्यवसायावरच अवलंबून असते. दरवर्षी खरीप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकºयांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या पीक कर्जासाठी शेतकरी मोठी आशा लावून असतात.तीन वर्षे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकºयांच्या हाती तीन वर्षीच्या खरीप हंगामातून काहीच लागले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. गतवर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकांना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी १३०४ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व आर्थिक जोखडात सापडलेला शेतकरी पाहून जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे जावून १४०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या १०७ टक्के पीक कर्ज वाटप केले. त्यामुळे शेतकºयांना गत खरीप हंगामात पीक कर्जाचा मोठा हातभार लागला.मागील वर्षी जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला. या पावसावर खरीप हंगामातील पिकेही चांगली बहरली. परंतु, नगदी पीक म्हणून ओखळल्या जाणाºया कापूस पिकावर पहिल्याच वेचणीनंतर बोंड अळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकºयांच्या हाती काहीच लागले नाही. आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकºयांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे. या उद्देशानेच खरीप हंगामासाठी १ हजार ७८३ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार १ मेपासून पीक कर्ज वाटपास सुरुवातही झाली आहे. ११ दिवसांत जिल्ह्यातील सर्व बॅकांनी २ हजार ९३२ शेतकºयांना १९ कोटी ३३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.गतवर्षी पावणेतीन लाख शेतकºयांनी घेतले पीक कर्जजिल्ह्यामध्ये तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांकडे २०१६ च्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यामुळे या शेतकºयांना पीक कर्ज मिळणे आवश्यक होते. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी सहकार्याच्या भावनेने काम केले. २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकांना देण्यात आलेले १३०४ कोटी रुपयांच्या उद्दिष्टांच्या पुढे जावून १४०८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ६०० शेतकºयांना या पीक कर्जाचा लाभ मिळाला होता.शेतकरी संभ्रमावस्थेतमहाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकºयाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे. परंतु, या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्या शेतकºयांना पूर्व कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे किती शेतकºयांचे कर्ज माफ झाले आहे, याची माहिती शेतकºयांना मिळेनासी झाली आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी लागणाºया बियाणे, औषधी व खते घेण्यासाठी शेतकºयांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे. मात्र आपले कर्ज माफ झाले की नाही, याच विचारात असलेला शेतकरी सध्या तरी संभ्रामवस्थेत असल्याचे पहावयास मिळते.खरीप हंगामासाठी दाखल झालेले पीक कर्जाचे प्रस्ताव बँक अधिकाºयांनी प्राधान्याने निकाली काढावेत व शेतकºयांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे.- खिल्लारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक