शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शंभर एकरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास ...

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास १०० एकरवरील रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, भुईमूग, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वालूर व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करीत कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके घेतली. मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर सप्टेंबर २०२० या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यानंतर खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग घेत खरीप हंगाामातील पिकांचे झालेले नुकसान रबी हंगामातील पिकांमधून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पारंपरिक ज्वारी पिकाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा. भुईमूग, ऊस, गहू व फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे या हंगामातील पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दि. १८ व १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातची नेली आहेत. त्यामुळे वालूर व परिसरातील शंभर एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

भाजप किसान मोर्चाचे साकडे

वालूर व परिसरातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड, भागवत दळवे, महादेव गायके, जीवन ढवळे, शिवहरी शेवाळे, प्रदीप झिंबरे, बळीराम गटकळ, सखाराम दळवे, गोविंद गटकळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.