शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शंभर एकरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास ...

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास १०० एकरवरील रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, भुईमूग, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वालूर व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करीत कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके घेतली. मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर सप्टेंबर २०२० या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यानंतर खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग घेत खरीप हंगाामातील पिकांचे झालेले नुकसान रबी हंगामातील पिकांमधून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पारंपरिक ज्वारी पिकाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा. भुईमूग, ऊस, गहू व फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे या हंगामातील पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दि. १८ व १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातची नेली आहेत. त्यामुळे वालूर व परिसरातील शंभर एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

भाजप किसान मोर्चाचे साकडे

वालूर व परिसरातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड, भागवत दळवे, महादेव गायके, जीवन ढवळे, शिवहरी शेवाळे, प्रदीप झिंबरे, बळीराम गटकळ, सखाराम दळवे, गोविंद गटकळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.