शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

शंभर एकरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास ...

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर व परिसरात १८ व १९ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे जवळपास १०० एकरवरील रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, भुईमूग, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वालूर व परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करीत कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके घेतली. मात्र ही पिके काढणीस आल्यानंतर सप्टेंबर २०२० या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यानंतर खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग घेत खरीप हंगाामातील पिकांचे झालेले नुकसान रबी हंगामातील पिकांमधून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. पारंपरिक ज्वारी पिकाकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा. भुईमूग, ऊस, गहू व फळबाग मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे या हंगामातील पिकांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दि. १८ व १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खरिपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातची नेली आहेत. त्यामुळे वालूर व परिसरातील शंभर एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

भाजप किसान मोर्चाचे साकडे

वालूर व परिसरातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनावर तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड, भागवत दळवे, महादेव गायके, जीवन ढवळे, शिवहरी शेवाळे, प्रदीप झिंबरे, बळीराम गटकळ, सखाराम दळवे, गोविंद गटकळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.