शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोविड योद्ध्यांना नुसताच ‘मान’; दोन महिन्यांचे मानधन थकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:13 IST

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा कमी पडली आणि या यंत्रणेच्या मदतीला धावले ते कंत्राटी कर्मचारी. कोरोनाच्या पहिल्या आणि ...

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा कमी पडली आणि या यंत्रणेच्या मदतीला धावले ते कंत्राटी कर्मचारी. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावरच जिल्ह्यातील अनेक कोरोना केअर केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर झालेल्या रुग्णांची बॉडी पीपीई किटमध्ये पॅक करण्याचे कामही या कर्मचाऱ्यांना करावे लागले. कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ जाण्यासही कोणी धजावत नव्हते. अशा वेळी कायम कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र संसर्ग कमी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना योद्ध्यांच्या कामाची हीच पावती का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवेत कायम करावे, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान ११ महिन्यांचे नियुक्ती आदेश द्यावेत, अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. त्याची दखल तर शासनाने घेतलीच नाही. परंतु, हक्काचे मानधन देण्यासाठीही विलंब लागत असल्याने धोरणांचा निषेध नोंदविला जात आहे.

बजेट नसल्याने थांबले मानधन

कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी बजेट उपलब्ध झाले नाही.

जिल्ह्यात एकूण एक हजार ३३४ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी प्रत्येक महिन्याला दोन कोटी ३४ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मागील चार महिन्यांपासून बजेट उपलब्ध झाले नसल्याने मानधन रखडले आहे.

इतर बजेटचा मानधनासाठी केला वापर

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी बजेट उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे एनआरएचएमच्या इतर बजेटमधून कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांचे केवळ दोन महिन्यांचेच वेतन सद्य:स्थितीला रखडले आहे. साधारणत: ९८ कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडलेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आता बजेटची प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्ग ओसरल्यानंतर पुढील नियुक्ती आदेश दिले नाहीत; त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. संकटाच्या काळात काम करून घेतले; परंतु, संकट कमी झाल्यानंतर मात्र या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वीच कंत्राटी कर्मचाऱ्यांना रखडलेल्या वेतनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करावे लागले होते.