शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना दिलासा; खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:35 IST

4 हजार शेतकऱ्यांना दिलासा

ठळक मुद्देसंचरबंदी असतानाही प्रक्रिया सुरू

सेलू:- संचारबंदी लागू  असली तरी सीसीआयकडे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे . 

बाजार समितीच्या सीसीआय कडून दोन महिन्यापासून कापसाची खरेदी केली जात होती. खुल्या बाजारापेक्षा  सीसीआय कडून समाधानकारक दर मिळत असल्याने शेतक-यांनी सीसीआयकडे  आपल्या कापसाची विक्री सर्वाधिक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु आणि त्यानंतर संचारबंदी लागू झाल्याने १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना आपली रक्कम कधी जमा होईल? उशीर झाला तर खर्च कसा भागविणार याची चिंता लागली  होती.

माञ बाजार समिती आणि  सीसीआयच्या अधिका-यांनी  समन्वय साधत त्या सात दिवसातील  कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना त्यांची रक्कम बॅक खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सीसीआय च्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात सर्व बाबी ची पुर्तता आणि  चुकीचे खाते नंबर आयएफसी कोड आदी  तांत्रिक दुरूस्ती करण्यासाठी ये - जा करावी लागणार असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करून शेतक-यांच्या बॅक खात्यावर लवकरात लवकर  रक्कम जमा करण्यासाठी ये-जा करण्याची परवानगी मागण्यात आली. बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी शेतक-यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर बाजार समितीने सीसीआयच्या रनर असलेल्या व्यक्तीला वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. दरम्यान,  संचारबंदीमुळे कापूस विक्री करून आपली रक्कम कधी जमा होईल याची चिंता शेतक-यांना होती. 

सुमारे चार हजार शेतकरी

१६ ते २३मार्च या काळात सुमारे ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय कडून करण्यात आली. यात जवळपास चार हजार शेतक-यांचे ४० कोटी रुपये आहेत. २३ मार्च नंतर संचारबंदी लागू झाल्याने कापूस खरेदी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे १६ ते २३ मार्च दरम्यान ची बीले तयार करणे तसेच चुकीचे खाते नंबर आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी सीसीआय च्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना औरंगाबाद तसेच इतर ठिकाणी जाऊन सर्व बाबी पूर्ण करावी लागतात. संचारबंदी लागू झाल्यानंतर ही प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वाढली होती.माञ जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी हा प्रश्न समजून घेऊन आणि शेतक-यांची गरज लक्षात घेत   संचारबंदीतही  ही प्रक्रिया सुरू ठेवण्ययाची सुचना दिली.  शेतक-यांना कापूस विक्रीची रक्कमे बाबत संभ्रम निर्माण झाला होता. माञ ३१ मार्च पर्यंत सर्व ४० कोटी रुपयांची सुमारे ४ हजार शेतक-यांची रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा होईल. त्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीMONEYपैसाparabhaniपरभणी