शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना दिलासा; खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:35 IST

4 हजार शेतकऱ्यांना दिलासा

ठळक मुद्देसंचरबंदी असतानाही प्रक्रिया सुरू

सेलू:- संचारबंदी लागू  असली तरी सीसीआयकडे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे . 

बाजार समितीच्या सीसीआय कडून दोन महिन्यापासून कापसाची खरेदी केली जात होती. खुल्या बाजारापेक्षा  सीसीआय कडून समाधानकारक दर मिळत असल्याने शेतक-यांनी सीसीआयकडे  आपल्या कापसाची विक्री सर्वाधिक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु आणि त्यानंतर संचारबंदी लागू झाल्याने १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना आपली रक्कम कधी जमा होईल? उशीर झाला तर खर्च कसा भागविणार याची चिंता लागली  होती.

माञ बाजार समिती आणि  सीसीआयच्या अधिका-यांनी  समन्वय साधत त्या सात दिवसातील  कापूस विक्री केलेल्या शेतक-यांना त्यांची रक्कम बॅक खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. सीसीआय च्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात सर्व बाबी ची पुर्तता आणि  चुकीचे खाते नंबर आयएफसी कोड आदी  तांत्रिक दुरूस्ती करण्यासाठी ये - जा करावी लागणार असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करून शेतक-यांच्या बॅक खात्यावर लवकरात लवकर  रक्कम जमा करण्यासाठी ये-जा करण्याची परवानगी मागण्यात आली. बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी शेतक-यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर बाजार समितीने सीसीआयच्या रनर असलेल्या व्यक्तीला वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतक-यांच्या बॅक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. दरम्यान,  संचारबंदीमुळे कापूस विक्री करून आपली रक्कम कधी जमा होईल याची चिंता शेतक-यांना होती. 

सुमारे चार हजार शेतकरी

१६ ते २३मार्च या काळात सुमारे ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय कडून करण्यात आली. यात जवळपास चार हजार शेतक-यांचे ४० कोटी रुपये आहेत. २३ मार्च नंतर संचारबंदी लागू झाल्याने कापूस खरेदी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे १६ ते २३ मार्च दरम्यान ची बीले तयार करणे तसेच चुकीचे खाते नंबर आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी सीसीआय च्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना औरंगाबाद तसेच इतर ठिकाणी जाऊन सर्व बाबी पूर्ण करावी लागतात. संचारबंदी लागू झाल्यानंतर ही प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वाढली होती.माञ जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी हा प्रश्न समजून घेऊन आणि शेतक-यांची गरज लक्षात घेत   संचारबंदीतही  ही प्रक्रिया सुरू ठेवण्ययाची सुचना दिली.  शेतक-यांना कापूस विक्रीची रक्कमे बाबत संभ्रम निर्माण झाला होता. माञ ३१ मार्च पर्यंत सर्व ४० कोटी रुपयांची सुमारे ४ हजार शेतक-यांची रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर जमा होईल. त्या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीMONEYपैसाparabhaniपरभणी