शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus : परभणी जिल्ह्यात दोन दिवसांची संचारबंदी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 19:14 IST

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़

ठळक मुद्दे१५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १७ जुलैचे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

परभणी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीत आणखी दोन दिवसांची वाढ केली असून, आता १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील व्यवहार बंद राहणार आहेत़

जिल्ह्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे़ त्यामुळे जिल्ह्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी १२ जुलैपासून ते १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती़ बुधवारी रात्री १२ वाजता हे आदेश शिथिल होणार होते़ त्यापूर्वीच सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले आहेत़ त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित व्यक्ती आढळून येत आहेत़ तसेच त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होत आहे़ परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे़ बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून कोरोना संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते १७ जुलैचे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी