शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

CoronaVirus: ९४ गावांसाठी केवळ ५३ कर्मचारी; सेलूचा आरोग्य विभाग हिंमतीने देतोय कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:28 IST

सेलू तालुक्यातील १४ गावात  आशाताईची नियुक्ती नाही.

ठळक मुद्देतालुक्यात बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्यांची संख्या अधिक

सेलू:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. उपलब्ध  डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या हिंमतीने दिवसराञ  काम करून कोरोनाचा मुकाबला तुटपुंज्या मनुष्यबळ असतानाही करत आहेत.

देशात लॉकडाऊन केलेल्या नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी महानगर आणि विविध राज्यात मुजरी करणारे हजारो स्थलांतरीत ग्रामस्थांचे लोंढे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंञणेवर मोठा ताण आला आहे.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैघकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आरोग्य सहाय्यक बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करत आहेत.

 सेलू तालुक्यात वालूर आणि देऊळगाव हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वालूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४ उपकेंद्र आणि  ५२ गावे आहेत तर देऊळगाव अंतर्गत १२ उपकेंद्र असून ४२गावांचा  समावेश आहे. एकूण ९४ गावात विविध शहरातून दाखल झालेल्या ग्रामस्थांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. संशयित आढल्यास संबंधित व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत १५ आरोग्य सेवक, २३ आरोग्य सेविका, ९ कंञाटी कर्मचारी २ आरोग्य सहाय्यक ५ वैघकीय अधिकारी तपासणीच्या कामात आहेत. तसेच प्रत्येक गावातील बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची वारंवार माहिती घेत आहेत. दरम्यान,  कोरोनाना मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. 

त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह पुणे येथून परतलेल्या चिकलठाणा बु आणि हातनूर येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा स्वॅब आरोग्य विभागाने घेतला होता. या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील ९४गावात आजपर्यंत ३हजार ४२८ स्थलांतरित ग्रामस्थ परतले आहेत. दररोज बाहेर गावाहून लोक परतत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, आणि ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे. उपलब्ध आरोग्य विभागातील कर्मचारी सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. केवळ बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी  सोनवणे यांनी केले.

 

१४ गावांना आशाताईची नियुक्ती नाही गाव पातळीवर आरोग्यच्या दृष्टीने काम करणा-या आशाताईची भूमिका महत्त्वाची  आहे. त्यांना  त्यांच्या कामावर मोबदला दिला जातो.  गावातील महिला आणि वृध्दाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. तसेच आरोग्य विभागाला त्यांची चांगली मदत होते. माञ सेलू तालुक्यातील  खादगाव, सोनवटी, तळतुंबा, वाघ पिंप्री, लाडनांद्रा, पिंप्रुळा,मापा,  पार्डी, आडसर, नांदगाव,  कुंभारी,  बोरगाव जहागिर,  शिंगठाळा  या १४ गावात आशाताईची नियुक्ती झालेली नाही. शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पडून आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ज्या गावात आशाताई नाहीत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाची मदत आरोग्य विभागला  घ्यावी लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी