शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

CoronaVirus: ९४ गावांसाठी केवळ ५३ कर्मचारी; सेलूचा आरोग्य विभाग हिंमतीने देतोय कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:28 IST

सेलू तालुक्यातील १४ गावात  आशाताईची नियुक्ती नाही.

ठळक मुद्देतालुक्यात बाहेर जिल्ह्यातील येणाऱ्यांची संख्या अधिक

सेलू:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. उपलब्ध  डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या हिंमतीने दिवसराञ  काम करून कोरोनाचा मुकाबला तुटपुंज्या मनुष्यबळ असतानाही करत आहेत.

देशात लॉकडाऊन केलेल्या नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक आदी महानगर आणि विविध राज्यात मुजरी करणारे हजारो स्थलांतरीत ग्रामस्थांचे लोंढे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या यंञणेवर मोठा ताण आला आहे.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैघकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच आरोग्य सहाय्यक बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्याचे काम करत आहेत.

 सेलू तालुक्यात वालूर आणि देऊळगाव हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. वालूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४ उपकेंद्र आणि  ५२ गावे आहेत तर देऊळगाव अंतर्गत १२ उपकेंद्र असून ४२गावांचा  समावेश आहे. एकूण ९४ गावात विविध शहरातून दाखल झालेल्या ग्रामस्थांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. संशयित आढल्यास संबंधित व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. सद्यस्थितीत १५ आरोग्य सेवक, २३ आरोग्य सेविका, ९ कंञाटी कर्मचारी २ आरोग्य सहाय्यक ५ वैघकीय अधिकारी तपासणीच्या कामात आहेत. तसेच प्रत्येक गावातील बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची वारंवार माहिती घेत आहेत. दरम्यान,  कोरोनाना मुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. 

त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह पुणे येथून परतलेल्या चिकलठाणा बु आणि हातनूर येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा स्वॅब आरोग्य विभागाने घेतला होता. या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तालुक्यातील ९४गावात आजपर्यंत ३हजार ४२८ स्थलांतरित ग्रामस्थ परतले आहेत. दररोज बाहेर गावाहून लोक परतत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील, आणि ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे. उपलब्ध आरोग्य विभागातील कर्मचारी सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. केवळ बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रावजी  सोनवणे यांनी केले.

 

१४ गावांना आशाताईची नियुक्ती नाही गाव पातळीवर आरोग्यच्या दृष्टीने काम करणा-या आशाताईची भूमिका महत्त्वाची  आहे. त्यांना  त्यांच्या कामावर मोबदला दिला जातो.  गावातील महिला आणि वृध्दाच्या आरोग्याची काळजी घेत असतात. तसेच आरोग्य विभागाला त्यांची चांगली मदत होते. माञ सेलू तालुक्यातील  खादगाव, सोनवटी, तळतुंबा, वाघ पिंप्री, लाडनांद्रा, पिंप्रुळा,मापा,  पार्डी, आडसर, नांदगाव,  कुंभारी,  बोरगाव जहागिर,  शिंगठाळा  या १४ गावात आशाताईची नियुक्ती झालेली नाही. शासनाकडे या संदर्भातील प्रस्ताव पडून आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ज्या गावात आशाताई नाहीत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाची मदत आरोग्य विभागला  घ्यावी लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी