शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

CoronaVirus : मिले सूर मेरा तुम्हारा ! विलगीकरण केंद्रात रंगला बहुभाषिकांच्या गप्पांचा फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 6:36 PM

एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या ९० नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे़ 

ठळक मुद्देजिंतूर तालुक्यातील विलगिकरण केंद्रातील चित्र प्रशासनाकडूनही घेतली जातेय काळजी

- ज्ञानेश्वर रोकडेजिंतूर : तालुक्यातील अकोली येथे शासकीय निवासी शाळेत स्थापित करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय बहुभाषिक नागरिकांचा दररोज गप्पांचा फड रंगत असून, त्यांच्या जेवणाची व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या ९० नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे़ 

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाºया पर जिल्ह्यातील नागरिकांना जिंतूर तालुक्यातील अकोली येथील शासकीय निवासी शाळेत तयार करण्यात  आलेल्या विलगीकरण केंद्रात ९० जणांना ठेवण्यात आले आहे़ या केंद्राची गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास पाहणी केली असता, वेगळेच चित्र पहावयास मिळाले़ या केंद्रात असलेल्या नागरिकांना मशिदीच्या पुढाकारातून दररोज चहा, बिस्कीट, केळी, खिचडी, पोहे आदींची सोय करून देण्यात आली आहे़ या साठी शेख अखिल, नवाज कुरेशी, शेख इलियास शेख बारी, रियाज खान, साजिद झकीया, अलीम शेख हे काळी मशिद कमिटीचे सदस्य या नागरिकांसाठी परिश्रम घेताना दिसून येत आहेत़ या विलगीकरण केंद्रात कोणाचं तान्हुलं आवारात धावताना दिसतं तर काही माता-भगिनी सामाजिक अंतर राखून घरी जाण्याच्या चिंतेत बोलत असल्याचे दिसून आले़ इथे जेवण्याची सोय भरपूर आहे़ आतापर्यंत उघड्यावर अथवा झोपडीत आयुष्य काढले़ इथे गाद्या आणि पंख्याखाली आराम करतोय, तरीही घराकडे जाण्याची ओढ कायम आहे, असे या निवारा केंद्रातील उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय नागरिक सांगत होते़

उत्तर प्रदेशातील एक मजूर यावेळी म्हणाला, ‘घर की याद आती है़़़ हमे घर छोड दो़़ आप कुछ किजीए, नाश्ता, खाना समय पे मिलता है, कोई शिकायत नही, फिर भी घर में माताजी, पिताजी, बच्चे है, उनकी बहुत याद आती है, हमे घर जाने दो’ असे म्हणत त्यांनी आपल्या भावना मोकळी वाट करून दिली़ यावेळी नागपूर येथून ऊसतोड करून जाणारे २७ जणही १४ दिवसांसाठी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ त्यांनीही घराची ओढ लागल्याचे सांगितले़ सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी नांदेडकडे आम्ही जात होतो; परंतु, पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने ताब्यात घेवून येथे क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे एका व्यक्तीने सांगितले़ यावेळी काही जण सावलीचा आधार घेवून मोबाईलवर नातेवाईकांशी बोलत असल्याचे दिसून आले़ तर काही जण मोबाईलवर गेम खेळत वेळ घालवत असल्याचे पहावयास मिळाले़ एकमेकांशी अनोळखी असलेले हे नागरिक आपापल्या भाषेतून आधूनमधून एक-दुसºयांशी संवाद साधतानाही दिसून आले़ 

केंद्रातील व्यक्तींची नियमित आरोग्य तपासणीयेथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाच्या वतीने नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते़ कोणाला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे तरी नाहीत ना, याची पडताळणी केली जाते़ तसेच त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी तहसीलदार सुरेश शेजूळ स्वत: लक्ष ठेवून आहेत़ या ठिकाणी दोन आरोग्य सेवकांची पूर्णवेळ आरोग्य विभागाने नियुक्ती केली आहे़ जिंतूर शहरात दोन ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ या ठिकाणी महसूल व नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी या विलगीकरण कक्षातील नागरिकांची काळजी घेत असल्याचे दिसून आले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी