शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

CoronaVirus : आता आली 'एसआरपी'ची बारी; पराभणीकरांना होईल का गांभीर्याची जाणीव ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:17 IST

एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली आहे

ठळक मुद्देबुधवार पासून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू केली जाणारपोलिसांकडून अनेक उपाय योजना

परभणी :  संचारबंदीच्या काळात नागरिकांना नियमांची शिस्त लावत घरीच बसणे बंधनकारक करण्यासाठी आता राज्य राखीव पोलीस दलाला (एसआरपी) परभणीत पाचारण करण्यात आले आहे़ एसआरपीची तुकडी सोमवारी रात्रीच दाखल झाली असून, बुधवारपासून प्रत्यक्ष उपाययोजना सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाली़

कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे़ या काळात सकाळी ७ ते १० हा वेळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना उपलब्ध करून दिला असला तरी त्यानंतरही दिवसभर शहरात वाहनांची वर्दळ दिसून येत आहे़ विशेष म्हणजे संचारबंदीबरोबरच जिल्हाधिका-यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावर वाहतूक करण्यास एका आदेशान्वये प्रतिबंध घातला आहे़

मागील १५ दिवसांपासून शहरात संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे़ तरीही नागरिकांना गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळेच आता थेट एसआरपीची कुमक पोलीस दलाने मागविली असून, ही कुमक परभणीत दाखल झाली आहे़ शहरातील रस्त्या-रस्त्यांवर एसआरपीचे पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत़ जिल्ह्याला प्राप्त झालेल्या एसआरपीच्या तुकडीपैकी कोतवाली, नानलपेठ आणि नवा मोंढा या  तिन्ही पोलीस ठाण्यांना प्रत्येकी १ प्लाटून वितरित करण्यात आली आहे़ त्याचसोबत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे़ त्यामुळे आता परभणीतील नागरिकांना शिस्त लावण्याचे काम एसआरपीच्या माध्यमातून केले जाणार आहे़

पोलीस दलाकडून अनेक उपायसंचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विविध उपाययोजना केल्या़ सुरुवातीला नागरिकांना घरी बसण्याची विनंती करण्यात आली़ त्यानंतर दंडुक्याचा प्रसादही देण्यात आला; परंतु, तरीही रस्त्यावरुन फिरणा-या नागरिकांची संख्या कमी होत नसल्याने दोन दिवसांपासून शहरातील सर्व रस्ते बॅरिकेटस् टाकून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत़ सुमारे ७० रस्त्यांवर लाकडी बॅरिकेटस् टाकले आहेत़ त्यानंतरही रस्त्यावर वाहन दिसल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे; परंतु, या कारवाईनंतरही रस्त्यावर फिरणााऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली नसल्याने आता एसआरपीला पाचारण करण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी