शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

घरात बसून असलेल्या ज्येष्ठांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी संचारबंदी लावून विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असला तरी घरातच ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी संचारबंदी लावून विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असला तरी घरातच बसून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच या कोरोनाचा सर्वाधिक धोका झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत मिळून ६१ ते ७० वर्षे वयोगटातील ४ हजार ७१० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यातील ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच वयोगटात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हावासीय त्रस्त आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसर्ग कमी झाला असला तरी मागे वळून पाहिले तर ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोना सर्वाधिक धोकादायक ठरल्याचे दिसते.

शासकीय आणि इतर सेवांमधून सर्वसाधारणपणे ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती होते. त्यानंतरचा काळ हा निवृत्तीचा काळ असतो. जबाबदाऱ्या कमी झाल्याने शक्यताे या वयोगटातील नागरिक घराबाहेर पडत नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले. मात्र, जे नागरिक घराबाहेर पडले, त्यांच्यापेक्षाही अधिक घराबाहेर न पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा संसर्ग धोकादायक ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६१ ते ७० या वयोटात सर्वाधिक ३३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इतर वयोगटाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोेगटातील ७ हजार २२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. ७१ ते८० या वयोगटात १ हजार ७९३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ ते ५० या वयोगटातील ८ हजार ८८१ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता ६१ ते ७० वयोगटासाठी दोन्ही कोरोना लाटा धोकादायक ठरल्याचे दिसते.

शंभरीपुढील नागरिकांनी मात्र घडविला आदर्श

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कोरोनाची लाट धोकादायक ठरली असली तरी १०० वर्षांपुढील नागरिकांनी मात्र आपली प्रतिकारक्षमता या काळातही सिद्ध करून दाखविली आहे. १०१ ते १३० या वयोगटातील ५२ नागरिकांना कोरोना झाला होता. त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता, ३.८५ टक्के एवढे आहे. तर ६१ ते ७० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण ७.०१ टक्के आहे. ९१ ते १०० या वयोगटात मात्र मृत्यूचे प्रमाण ११.६३ एवढे सर्वाधिक आहे.

३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक बाधित

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३२५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक १० हजार ८६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर ० ते १० वर्षे या बालकांच्या वयोगटात सर्वात कमी १ हजार ४२४ रुग्ण नोंद झाले आहेत.