शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कोरोना रुग्णांचा जेवणावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार ...

जिंतूर : येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना जेवणाच्या व्यवस्थेबरोबरच स्वच्छता नसल्याने रुग्णांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत सोमवारपासून जेवणावर बहिष्कार टाकला आहे. जिंतूर शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सद्य:स्थितीला ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु, या रुग्णांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही. निकृष्ट जेवणाबरोबरच अवेळी जेवण मिळत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे सकाळचा नाष्टा, चहा आणि वेळेवर जेवण मिळत नाही. जे काही देण्यात येत आहे ते निकृष्ट व दर्जाहीन असल्याने अनेकांनी जेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपासमोरीची वेळ आली आहे. सोमवारपासून या सर्व रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे जेवण मिळत नसताना दुसरीकडे स्वच्छतेचाही अभाव दिसून येत आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने कोरेाना रुग्णांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत

जिंतूरच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असताना प्रशासन मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जेवणाची सर्व व्यवस्था महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. परंतु, नेमकी याची जबाबदारी घ्यायची कोणी? या बाबतीत एकमत नाही. याचा परिणाम रुग्णांवर होत आहे. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी एकत्र येत जेवणावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने या संदर्भात पावले उचलली नाही तर आम्ही क्वारंटाईन सेंटर सोडून जाऊ असे अनेक रुग्णांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.