शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

कोरोनाचा उद्रेक सुरूच; ३४१ नवे रुग्ण; सहाजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. दररोज २०० ते ३०० नवीन रुग्णांची नोंद होत आहेत. २४ मार्चरोजी १ ...

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. दररोज २०० ते ३०० नवीन रुग्णांची नोंद होत आहेत. २४ मार्चरोजी १ हजार ५३३ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार १५४ अहवालांमध्ये २४२ आणि रॅपिड टेस्टच्या ३७९ अहवालांमध्ये ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. दररोज रुग्ण दगावत असल्याने जिल्हावासीयांत चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरुष आणि १ महिला तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४ पुरुष अशा ६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता ११ हजार ६२२ झाली असून, ९ हजार ९९५ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३६४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २६३ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ११६ रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयात २२० रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९२७ झाली आहे.