शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कोरोनामुळे अर्थकारण बदलले; हाताला काम नसल्यामुळे श्रमिकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:57 IST

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात.

ठळक मुद्देकाम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते घरी 

परभणी : शहरातील शनिवार बाजारात आठवड्याला पालेभाज्यांचा बाजार भरत असला तरी दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत येथे श्रमीक (मजूर) कामाच्या अपेक्षेने हजेरी लावतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ंआहे.

मोर्चा, दिंडी, शालेय उपक्रमांचा शनिवार बाजार हा साक्षीदार असला तरी श्रमिकही याच ठिकाणावरुन आपल्या कामाला सुरुवात करतात. मागील तीस वर्षापासून दररोज सकाळी सहा ते अकरा या वेळेत दोनशे ते तीनशेमजूर  या ठिकाणी उभे राहून मिळेल ते काम उपलब्ध होईल का याची प्रतिक्षा करोत असतात. या श्रमिकांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कुदळ, फावडे, खुरपे, टोपले, पहार आदी साहित्य त्य्प्या समोबत असते. मागील पाच महिन्यांपासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडल्याने या श्रमिकांच्या हाताला काम मिळेना झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एखादा अनोळखी व्यक्ती सकाळच्या वेळी बाजारात आला की, त्याच्या भोवती श्रमीक गोळा होतात. काय काम आहे?, कुठे जायचे, कोणते काम करायचे? असा प्रश्नांचा भडीमार करतात. यावर काम मिळाले आनंदी होतात नाही तर निराश होऊन जागेवर जावून उभे राहतात. हे चित्र नित्याचे झाले आहे.

‘जिल्हा प्रशासनाने कामे उपलब्ध करुन करावीत’मागील पाच महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे या श्रमिकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनशे ते तीनशे हातात मिळणारी रोजंदारी ती पण कोरोना आजारामुळे मिळत नाहीत. जिल्हा प्रशासनाने श्रमिकांना काम उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेख मुन्ना, सय्यद इरफान, शेख इस्माईल, शेख इरफान, अशोक गुंजकर, विशाल कांबळे, सय्यद जावेद, अमीर खान यांनी केली आहे.

आजवर अशी वेळ कधी आली नव्हती शनिवार बाजाराच्या ठिकाणाहून हमखास काम मिळते म्हणून भल्या पहाटे उठून सकाळी सहा वाजता येथे अनेक जण येतात. सकाळी अकरा पर्यंत ठिकाणी ते थांबतात. काम मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो नाही तर निराश होऊन सोबत आणलेले साहित्य परत डोक्यावर घेऊन घरी परतात. आजवर उपाशी राहण्याची वेळ कधी आली नव्हती, ती आज कोरोनाच्या संसर्गामुळे आमच्यावर आली आहे.- सय्यद जावेद, श्रमिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक