शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:33 IST

जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़ या कामांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे़ 

मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची समस्या तीव्र नसली तरी ग्रामीण भागात अनेक गावांना टंचाई जाणवू लागली आहे़ पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच पुढील सहा महिन्यांच्या पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार केला होता़ तब्बल २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा हा आराखडा तयार करून टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये या आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते़ आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून या प्रत्येक तीन महिन्यांच्या टप्प्यांमध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली़ सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करावयाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे़ 

जिल्ह्यात पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली आहे़ यात टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना आणि नवीन विहीर, बोअर घेण्याची कामे केली जात आहेत़ जिल्हाभरात विंधन विहिरींच्या दुरुस्तीवर ५१ लाख ५१ हजारांचा खर्च केला जात असून, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ६६ लाख ८ हजार रुपये खर्च केला जात आहे़ त्याचप्रमाणे १६ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चातून तात्पुरती पूरक नळ योजना घेतली जात आहे़ ग्रामीण भागामध्ये ही कामे सुरू झाली आहेत़ मे महिना जिल्ह्यासाठी टंचाईचाच ठरत आहे़ या महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे़ अजूनही उन्हाची तीव्रता कमी झाली नसल्याने पाणी पातळी खालावत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे़ 

१२८ विंधन विहिरींना मंजुरीपरभणी जिल्ह्यात या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे संबंधित गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन विंधन विहीर खोदकामांसाठी मंजुरी दिली आहे़ आतापर्यंत १२८ विंधन विहिरींच्या खोदकामांना मंजुरी देण्यात आली असून, या विहिरी घेतल्यानंतर त्या त्या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे़ सध्या विंधन विहीर घेण्याची कामे सुरू आहेत.

विंधन विहीर दुरुस्तीची कामे सुरू

जिल्ह्यात २२४ ठिकाणी विंधन विहिरींची दुरुस्ती केली जात आहे़ त्यात पूर्णा आणि गंगाखेड येथे प्रत्येकी ५१ ठिकाणी विंधन विहिरी दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यावर पूर्णा तालुक्यात १० लाख ३४ हजार तर गंगाखेड तालुक्यात १० लाख १४ हजारांचा खर्च होत आहे़ सेलू व जिंतूर तालुक्यामध्ये प्रत्येकी ३८ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती होत असून, सेलू तालुक्यात १२ लाख ३२ हजार तर जिंतूर तालुक्यात ९ लाख ४५ हजारांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मानवत तालुक्यात १०, पाथरी ६, सोनपेठ ९ आणि परभणी तालुक्यात एका ठिकाणी विंधन विहिरीची दुरुस्ती केली जात आहे़ 

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक कामेपाणीटंचाईच्या झळा संपूर्ण जिल्ह्यात बसत असल्या तरी जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांमध्ये  तीव्रता अधिक आहे़ जिल्हा प्रशासनाने जिंतूर तालुक्यात एकूण ९० कामे सुरू केली असून, ४८ लाख ५० हजार रुपये खर्च करून टंचाईवर मात केली जात आहे़ गंगाखेड तालुक्यामध्ये टंचाई निवारणाची १०३ कामे सुरू असून, त्यावर २६ लाख २५ हजार रुपये खर्च होत आहेत़ तर पूर्णा तालुक्यात १९ लाख २० हजार रुपये खर्चाची ७८ कामे, सेलू तालुक्यात १८ लाख ९४ हजार रुपये खर्चातून ४४ कामे सुरू आहेत़ पालम तालुक्यात १३ लाख ४ हजार रुपये खर्च करून ५१ कामे सुरू आहेत़ परभणी तालुक्यात ३ लाख ४५ हजार, सोनपेठ तालुक्यात २ लाख ५२ हजार, पाथरी तालुक्यात ८ लाख ७४ हजार आणि मानवत तालुक्यात १ लाख ९८ हजारांची कामे सुरू आहेत़ 

२९ कोटी ४३ लाखांचा आराखडापाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़ त्यात ग्रामीण भागात ५१४ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ९ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ पालम तालुक्यात ४ कोटी १४ लाख, पूर्णा तालुक्यात ५ कोटी १९ लाख तर पाथरी तालुक्यात २ कोटी १२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ या आराखड्यानुसार कामे घेतली जात आहेत़ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईState Governmentराज्य सरकारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीfundsनिधी