शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी जिल्ह्यात दोन कोटींतून होणार पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:33 IST

जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़

परभणी : जिल्ह्यात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे विविध कामे सुरू केली आहेत़ या कामांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे़ 

मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईची समस्या तीव्र नसली तरी ग्रामीण भागात अनेक गावांना टंचाई जाणवू लागली आहे़ पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबर महिन्यातच पुढील सहा महिन्यांच्या पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार केला होता़ तब्बल २९ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपयांचा हा आराखडा तयार करून टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये या आराखड्यानुसार उपाययोजना करण्याचे निश्चित केले होते़ आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून या प्रत्येक तीन महिन्यांच्या टप्प्यांमध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली़ सध्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करावयाच्या कामांचा आढावा घेतला जात आहे़ 

जिल्ह्यात पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात केली आहे़ यात टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना आणि नवीन विहीर, बोअर घेण्याची कामे केली जात आहेत़ जिल्हाभरात विंधन विहिरींच्या दुरुस्तीवर ५१ लाख ५१ हजारांचा खर्च केला जात असून, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ६६ लाख ८ हजार रुपये खर्च केला जात आहे़ त्याचप्रमाणे १६ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चातून तात्पुरती पूरक नळ योजना घेतली जात आहे़ ग्रामीण भागामध्ये ही कामे सुरू झाली आहेत़ मे महिना जिल्ह्यासाठी टंचाईचाच ठरत आहे़ या महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे़ अजूनही उन्हाची तीव्रता कमी झाली नसल्याने पाणी पातळी खालावत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे़ 

१२८ विंधन विहिरींना मंजुरीपरभणी जिल्ह्यात या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणी पातळी खोल गेली आहे़ त्यामुळे संबंधित गावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन विंधन विहीर खोदकामांसाठी मंजुरी दिली आहे़ आतापर्यंत १२८ विंधन विहिरींच्या खोदकामांना मंजुरी देण्यात आली असून, या विहिरी घेतल्यानंतर त्या त्या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे़ सध्या विंधन विहीर घेण्याची कामे सुरू आहेत.

विंधन विहीर दुरुस्तीची कामे सुरू

जिल्ह्यात २२४ ठिकाणी विंधन विहिरींची दुरुस्ती केली जात आहे़ त्यात पूर्णा आणि गंगाखेड येथे प्रत्येकी ५१ ठिकाणी विंधन विहिरी दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यावर पूर्णा तालुक्यात १० लाख ३४ हजार तर गंगाखेड तालुक्यात १० लाख १४ हजारांचा खर्च होत आहे़ सेलू व जिंतूर तालुक्यामध्ये प्रत्येकी ३८ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती होत असून, सेलू तालुक्यात १२ लाख ३२ हजार तर जिंतूर तालुक्यात ९ लाख ४५ हजारांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मानवत तालुक्यात १०, पाथरी ६, सोनपेठ ९ आणि परभणी तालुक्यात एका ठिकाणी विंधन विहिरीची दुरुस्ती केली जात आहे़ 

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक कामेपाणीटंचाईच्या झळा संपूर्ण जिल्ह्यात बसत असल्या तरी जिंतूर, गंगाखेड, पालम या तालुक्यांमध्ये  तीव्रता अधिक आहे़ जिल्हा प्रशासनाने जिंतूर तालुक्यात एकूण ९० कामे सुरू केली असून, ४८ लाख ५० हजार रुपये खर्च करून टंचाईवर मात केली जात आहे़ गंगाखेड तालुक्यामध्ये टंचाई निवारणाची १०३ कामे सुरू असून, त्यावर २६ लाख २५ हजार रुपये खर्च होत आहेत़ तर पूर्णा तालुक्यात १९ लाख २० हजार रुपये खर्चाची ७८ कामे, सेलू तालुक्यात १८ लाख ९४ हजार रुपये खर्चातून ४४ कामे सुरू आहेत़ पालम तालुक्यात १३ लाख ४ हजार रुपये खर्च करून ५१ कामे सुरू आहेत़ परभणी तालुक्यात ३ लाख ४५ हजार, सोनपेठ तालुक्यात २ लाख ५२ हजार, पाथरी तालुक्यात ८ लाख ७४ हजार आणि मानवत तालुक्यात १ लाख ९८ हजारांची कामे सुरू आहेत़ 

२९ कोटी ४३ लाखांचा आराखडापाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने २९ कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़ त्यात ग्रामीण भागात ५१४ कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ९ कोटी २४ लाख २० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ पालम तालुक्यात ४ कोटी १४ लाख, पूर्णा तालुक्यात ५ कोटी १९ लाख तर पाथरी तालुक्यात २ कोटी १२ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ या आराखड्यानुसार कामे घेतली जात आहेत़ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईState Governmentराज्य सरकारParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीfundsनिधी