शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात सध्या दहशत व भीतीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या होत आहे : कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:27 IST

देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने केला.

ठळक मुद्देबॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजदाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्न

परभणी : देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.

'संविधान बचाव, देश बचाव' अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेसाठी कन्हैय्याकुमार आज परभणीत आला आहे. यावेळी त्याने शहरातील बी. रघुनाथ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे, कॉ. राजन क्षीरसागर, भगवान वाघमारे, रवि सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, ही भारतीय लोकशाहीवर हल्ला करणारी घटना आहे. सद्यस्थितीत देशात भय व दहशतीचे वातावरण आहे. संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे. भारतीय लोकशाही कमजोर करुन भीडतंत्राला मजबूत करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून केला जात आहे; परंतु, असत्य हे जास्त दिवस टिकत नसते. एक- ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला. 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेगेल्या चार वर्षापूर्वी केंद्रातील सरकारने सत्तेवर येताना जनतेला जी आश्वासने दिली होती, त्याचे काय झाले? या बाबतचा प्रश्न  सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. संविधान बचाव, देश बचाव हे अभियान कोण्या पक्षाच्या, कोण्या सरकारच्या विरोधातला कार्यक्रम नाही किंवा कोणाला पंतप्रधान पदावरुन खाली खेचण्याचा किंवा कोणाला पंतप्रधान पदावर बसविण्याचा कार्यक्रम नाही तर संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. आम्हाला भारतीय लोकशाही मजबूत करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देश बनवायचा आहे तर त्यांना सावरकरांच्या विचारांचा देश बनवायचा आहे. 

बॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजविविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रियेस आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ईव्हीएमला सर्वप्रथम लालकृष्ण आडवाणी यांनी विरोध केला होता. शिवाय जगातील बहुतांश विकसित देश आता बॅलेटपेपरनेच निवडणुका घेण्याच्या तयारीत आहेत. मी आयटी इंजिनिअर नाही किंवा संगणक तज्ज्ञ नाही; परंतु, बहुतांश पक्ष संघटना बॅलेट पेपरची मागणी करीत आहेत. व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची मागणी करीत आहेत. तर त्या दृष्टीकोनातून विचार करण्यास काय हरकत आहे, शेवटी लोकशाहीत बहुमतालाच महत्व आहे.

दाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्नपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करीत आरोपींना पकडले; परंतु, महाराष्ट्रात विचारवंत नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आता कर्नाटकमध्ये कारवाई होत असल्याने तेथील पोलीस महाराष्ट्रात येऊन कारवाई करतील म्हणून लोकांना संभ्रमित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कारवाई सुरु झाली आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. याबाबत खोटी माहिती पसरविली जात आहे, असा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार यांनी केला. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारparabhaniपरभणीSocialसामाजिकGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार