शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

देशात सध्या दहशत व भीतीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या होत आहे : कन्हैय्याकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:27 IST

देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने केला.

ठळक मुद्देबॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजदाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्न

परभणी : देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.

'संविधान बचाव, देश बचाव' अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेसाठी कन्हैय्याकुमार आज परभणीत आला आहे. यावेळी त्याने शहरातील बी. रघुनाथ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे, कॉ. राजन क्षीरसागर, भगवान वाघमारे, रवि सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, ही भारतीय लोकशाहीवर हल्ला करणारी घटना आहे. सद्यस्थितीत देशात भय व दहशतीचे वातावरण आहे. संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे. भारतीय लोकशाही कमजोर करुन भीडतंत्राला मजबूत करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून केला जात आहे; परंतु, असत्य हे जास्त दिवस टिकत नसते. एक- ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला. 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेगेल्या चार वर्षापूर्वी केंद्रातील सरकारने सत्तेवर येताना जनतेला जी आश्वासने दिली होती, त्याचे काय झाले? या बाबतचा प्रश्न  सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. संविधान बचाव, देश बचाव हे अभियान कोण्या पक्षाच्या, कोण्या सरकारच्या विरोधातला कार्यक्रम नाही किंवा कोणाला पंतप्रधान पदावरुन खाली खेचण्याचा किंवा कोणाला पंतप्रधान पदावर बसविण्याचा कार्यक्रम नाही तर संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. आम्हाला भारतीय लोकशाही मजबूत करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देश बनवायचा आहे तर त्यांना सावरकरांच्या विचारांचा देश बनवायचा आहे. 

बॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजविविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रियेस आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ईव्हीएमला सर्वप्रथम लालकृष्ण आडवाणी यांनी विरोध केला होता. शिवाय जगातील बहुतांश विकसित देश आता बॅलेटपेपरनेच निवडणुका घेण्याच्या तयारीत आहेत. मी आयटी इंजिनिअर नाही किंवा संगणक तज्ज्ञ नाही; परंतु, बहुतांश पक्ष संघटना बॅलेट पेपरची मागणी करीत आहेत. व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची मागणी करीत आहेत. तर त्या दृष्टीकोनातून विचार करण्यास काय हरकत आहे, शेवटी लोकशाहीत बहुमतालाच महत्व आहे.

दाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्नपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करीत आरोपींना पकडले; परंतु, महाराष्ट्रात विचारवंत नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आता कर्नाटकमध्ये कारवाई होत असल्याने तेथील पोलीस महाराष्ट्रात येऊन कारवाई करतील म्हणून लोकांना संभ्रमित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कारवाई सुरु झाली आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. याबाबत खोटी माहिती पसरविली जात आहे, असा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार यांनी केला. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारparabhaniपरभणीSocialसामाजिकGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार