शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून माहितीचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 11:30 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली.

ठळक मुद्देया कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़

परभणी : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली़ शेतकरी कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा होतो, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? याची माहिती अधिका-यांनी घेतली़ विशेष म्हणजे या कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ 

मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले़ त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या़ अनेक शेतक-यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या़ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासनाच्या वतीने एक लाख रुपयांची तातडीची मदत यापूर्वीच देण्यात आली आहे़ मात्र सध्या या कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा चालाते, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो की नाही? याची खातरजमा करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना भेट देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ग्रामीण भागात पोहचले़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये महसूलचे कर्मचारी शेतकरी कुटूंबियांच्या घरी पोहचले़ 

या कुटूंबियांची आस्थेवाईक चौकशी करीत प्राप्त झालेल्या विवरणपत्रात माहिती जमा करण्यात आली़ शासनाच्या आदेशानुसार या कुटूंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? त्यांचे जीवनमान सध्या कसे आहे? या पुढे कुटूंबियांना कोणता लाभ देता येऊ शकतो का? याचे वर्गीकरण केले जाणार असून, त्यानुसार कुटूंबियांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. दरम्यान, आर्थिक विवंचनेमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटूंबियांना  प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आधार मिळणार आहे़  

साडेचारशे कर्मचा-यांची केली नियुक्ती

१ जानेवारी २०१२ ते ३० आॅक्टोबर २०१७ या काळात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची यादी प्रशासनाने तयार केली आहे़ या प्रत्येक कुटूंबियांच्या घरी जाऊन त्यांची माहिती १५ नोव्हेंबर रोजी एकत्रित करण्यात आली़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना शेतकरी कुटूंबियांची यादी देऊन बुधवारी दिवसभरात या कुटूंबियांना भेट देण्याचे नियोजन आखण्यात आले़ त्यानुसार अधिकाºयांनी बुधवारी ही माहिती संकलित केली आहे़  

मनोबल उंचावण्यासाठी उपक्रमशेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कुटूंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते़ कुटूंब उघड्यावर येते़ अशा कुटूंबांना शासन योजनांचा लाभ देत असले तरी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून या कुटूंबियांची परिस्थिती काय आहे? ही कुटूंबे स्वबळावर उभी राहिलीत का? याची पाहणी करणे आणि नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़ विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार आहे़. यानंतर प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची माहिती एकत्रित करून या कुटूंबियांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभही दिला जाणार आहे़  

असा आहे उपक्रमविभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी  आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती एकत्रित करण्यात आली़ १८ नोव्हेंबर रोजी या कुटूंबियांची माहिती स्वतंत्र विवरणपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाणार आहे़ २४ नोव्हेंबर रोजी उपलब्ध माहिती संकेतस्थळावर भरली जाणार आहे़ २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात जिल्हाधिकारीस्तरावर प्राप्त माहितीचे विश्लेषण केले जाणार असून, कुटूंबियांना कोणत्या योजनेचा लाभ देता येऊ शकतो, याची निश्चिती केली जाणार आहे तर ८ ते २२ डिसेंबर या काळामध्ये निश्चित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार