शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून माहितीचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 11:30 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली.

ठळक मुद्देया कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़

परभणी : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली़ शेतकरी कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा होतो, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? याची माहिती अधिका-यांनी घेतली़ विशेष म्हणजे या कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ 

मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले़ त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या़ अनेक शेतक-यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या़ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासनाच्या वतीने एक लाख रुपयांची तातडीची मदत यापूर्वीच देण्यात आली आहे़ मात्र सध्या या कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा चालाते, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो की नाही? याची खातरजमा करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना भेट देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ग्रामीण भागात पोहचले़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये महसूलचे कर्मचारी शेतकरी कुटूंबियांच्या घरी पोहचले़ 

या कुटूंबियांची आस्थेवाईक चौकशी करीत प्राप्त झालेल्या विवरणपत्रात माहिती जमा करण्यात आली़ शासनाच्या आदेशानुसार या कुटूंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? त्यांचे जीवनमान सध्या कसे आहे? या पुढे कुटूंबियांना कोणता लाभ देता येऊ शकतो का? याचे वर्गीकरण केले जाणार असून, त्यानुसार कुटूंबियांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. दरम्यान, आर्थिक विवंचनेमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटूंबियांना  प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आधार मिळणार आहे़  

साडेचारशे कर्मचा-यांची केली नियुक्ती

१ जानेवारी २०१२ ते ३० आॅक्टोबर २०१७ या काळात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची यादी प्रशासनाने तयार केली आहे़ या प्रत्येक कुटूंबियांच्या घरी जाऊन त्यांची माहिती १५ नोव्हेंबर रोजी एकत्रित करण्यात आली़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना शेतकरी कुटूंबियांची यादी देऊन बुधवारी दिवसभरात या कुटूंबियांना भेट देण्याचे नियोजन आखण्यात आले़ त्यानुसार अधिकाºयांनी बुधवारी ही माहिती संकलित केली आहे़  

मनोबल उंचावण्यासाठी उपक्रमशेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कुटूंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते़ कुटूंब उघड्यावर येते़ अशा कुटूंबांना शासन योजनांचा लाभ देत असले तरी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून या कुटूंबियांची परिस्थिती काय आहे? ही कुटूंबे स्वबळावर उभी राहिलीत का? याची पाहणी करणे आणि नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़ विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार आहे़. यानंतर प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची माहिती एकत्रित करून या कुटूंबियांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभही दिला जाणार आहे़  

असा आहे उपक्रमविभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी  आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती एकत्रित करण्यात आली़ १८ नोव्हेंबर रोजी या कुटूंबियांची माहिती स्वतंत्र विवरणपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाणार आहे़ २४ नोव्हेंबर रोजी उपलब्ध माहिती संकेतस्थळावर भरली जाणार आहे़ २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात जिल्हाधिकारीस्तरावर प्राप्त माहितीचे विश्लेषण केले जाणार असून, कुटूंबियांना कोणत्या योजनेचा लाभ देता येऊ शकतो, याची निश्चिती केली जाणार आहे तर ८ ते २२ डिसेंबर या काळामध्ये निश्चित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार