शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत हमीभाव केंद्रावरील शेतमालाची खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : खरीप हंगामातील शेतमाल विक्री करताना शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील शेतमाल विक्री करताना शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंदे्र सुरु केली. परंतु, जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपला शेतमाल विक्री केला. तीन महिन्यात या केंद्रावर केवळ ४ हजार ३०० क्विंटल धान्याची खरेदी झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन, मूग, उडीद या कडधान्याचे उत्पादन घेतले. त्यांना थोड्याफार प्रमाणात या पिकातून उत्पादनही झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी शेतमाल विक्री करताना कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले.या केंद्राच्या माध्यमातून सोयाबीनसाठी ३ हजार ५० रुपये, मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये या हमीभाव दराने शेतमालाची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी कडधान्य उत्पादक शेतकरी पुरता घायाळ झाला.हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यामध्ये सहा हमीभाव केंद्रावर तीन महिन्यात जवळपास ४ हजार ३०० क्विंटल सोयाबीन, मूग व उडीद या शेतमालाची विक्री झाली.१३ जानेवारीपासून हमीभाव खरेदी केंद्रावरील शेतमाल खरेदीची मुदत संपल्याने हे केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवून खाजगी बाजारपेठेतच आपला शेतमाल विक्री करण्यास प्राधान्य दिल्याचे हमीभाव खरेदी केंद्राकडून आलेल्या आकडेवाडीवरुन दिसून येते.अशी झाली कडधान्याची खरेदीनाफेडच्या वतीने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ३९९.५० क्विंटल, उडीद शून्य तर सोयाबीनची ७२३ क्विंटल, मानवत येथील केंद्रावर मूग १७६. ५०, उडीद शून्य तर सोयाबीनची ७५३ क्विंटल, जिंतूर, मूग २१६ क्विंटल, उडीद ५६१ क्विंटल तर सोयाबीनची ३८५ क्विंटल, सेलू येथे मूग ६४७. ९१ क्विंटल, उडीद ९७.३५ क्विंटल तर सोयाबीनची २६२.३८ क्विंटल, पूर्णा मूग ७२ क्विंटल, उडीद २७.५० क्विंटल तर सोयाबीनची ४० क्विंटल खरेदी झाली. असे एकूण जिल्ह्यातील ६ केंद्रावर तीन महिन्याच्या कालावधीत केवळ ४ हजार ३०० क्विंटल कडधान्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती नाफेडकडून देण्यात आली.गंगाखेड केंद्रावर खरेदीच नाहीगंगाखेड शहर व तालुक्यातील शेतकºयांच्या खरीप हंगामातील शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्य शासनाने मोठ्या थाटामाटात हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परंतु, तीन महिने सुरु असलेल्या या खरेदी केंद्रावर सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे तीन महिन्याच्या कालावधीत या खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी झाली नाही.