शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सीआयडीकडून परभणी पोलिसांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:58 IST

सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली.

परभणी : शहरात संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेनंतर अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षकांकडून परभणीतील पोलिसांची चौकशी बुधवारी करण्यात आली.

गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे परभणीमध्ये नानलपेठ पोलिस ठाणे येथे बुधवारी दाखल झाले होते. सीआयडी पथकाकडून नानलपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांचे जवाब तसेच चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्य मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणात सुनावणी झाली होती. तसेच यापूर्वी न्यायमूर्ती आचलिया यांनी सुद्धा परभणीत भेट देऊन पाहणी केली होती. आता त्यानंतर सीआयडी पथकाकडून ही चौकशी प्राथमिक स्तरावर सुरू आहे. यामध्ये पुढे घटनाक्रम तसेच अन्य काही बाबींची चौकशी सुद्धा होणार असल्याचे समजते. त्यामुळे आता विविध चौकशी समिती, अहवाल, पथकांच्या भेटी, यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूर्यवंशी प्रकरणाने पोलिस दल हादरलेशहरात संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर दंगल उसळली. या दंगलीदरम्यान तोडफोडही झाली. यात अनेकांना अटक झाली होती. यातीलच एक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात असताना मृत्यू झाल्याने पुन्हा प्रकरण पेटले. आता याचा न्यायदंडाधिकारी चौकशी अहवाल सादर झाला अन् पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले. ७९ पोलिसांना नोटिसा देणार असल्याचे ऐकायला मिळत असल्याने पोलिस दलही हादरले आहे.

राज्य मानव अधिकार आयोगासमोर अहवाल१५ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन झाले. त्याचा प्राथमिक अहवाल व्हायरल झाला. मारहाणीत धक्का बसल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली होती. शिवाय हा प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर यात आचलिया समिती नेमली होती. या समितीनेही नुकतीच परभणीत येऊन चौकशी केली होती. पोलिस, घटनास्थळ व मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची आचलिया यांनी भेट घेतली होती. तर त्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष व सदस्यांनी भेट दिली होती. त्यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत होते. मात्र यात कारवाई होत नसल्याचा आरोपच विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी केला होता. मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनेही या प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. शासनाची मदतही नाकारली. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ यांना श्वसनाचा आजार असल्याचे म्हटले होते. त्यावरूनही हे कुटुंब नाराज होते. राज्य मानव अधिकार आयोगासमोर तब्बल ४५१ पानांचा न्यायदंडाधिकारीय अहवाल सादर केला आहे. यात सुनावणीही झाली. सूर्यवंशी कुटुंबीयांनीही येथे हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची व यात त्यांना मारहाण झाल्याचे म्हटले असल्याचे सांगितले जात आहे. हा अहवाल बाहेर आला नसला तरीही यामुळे पोलिस दलातील वातावरण तंगले आहे.

पोलिसांना शिक्षा व्हावी, सोमनाथच्या आईची मागणीमाझ्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असून पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे. तर आयोगासमोरही त्यांनी आपली अशीच बाजू मांडली आहे. तर या पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली, असे त्या अजूनही सांगत आहेत.

महिनाभर आंदोलन अन् पुन्हा लाँगमार्चपरभणी येथील उपोषण मैदानावर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जवळपास दीड महिना आंदोलन केले. सातत्याने पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित विविध मागण्या घेऊन परभणी ते मुंबई लाँगमार्च काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करून त्यातील काही मागण्या मान्य केल्या होत्या. शिवाय काँग्रेसच्या वतीनेही आझाद मैदानावर आक्राेश मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी