शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; दीड एकरात लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:39 IST

वेगळा प्रयोग करत शेतकऱ्याने कमी जागेत, कमी गुंतवणीत चांगले उत्पादन घेतले

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी) : तरुण शेतकरी आता शेतीमध्ये बदल करू लागले आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोगाची कास धरून अनेक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. असाच वेगळा प्रयोग करत तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकऱ्याने सहा महिन्यातच मिरची पिकाने लखपती बनवलं. तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगलाच गोडवा निर्माण केल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. 

पाथरी तालुक्यातील वाघाळा गावातील 28 वर्षीय शेतकरी ऋषिकेश घुंबरे याचे वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यामुळे १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर ऋषिकेश आईला मदत करण्यासाठी शेतीकडे वळला. अनेक वर्षांपासून १० एकर बागायती शेतीत पारंपरिक पद्धतीने उसाचे पीक घेतले जात असे. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. 

दरम्यान, काही तरी वेगळे पिक शेतात घेण्याचा विचार ऋषिकेश करत होता. काही प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत त्याने २५ डिसेंबर 2022 रोजी दीड एकर शेतात शार्क १ वाणाच्या मिरचीची लागवड केली. हे वाण लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लागवडीनंतर काही महिन्यांतच मिरची तोडणी सुरु झाली. आतापर्यंत ३४ क्विंटल हिरवी मिरची विक्रीतून १ लाख २ हजार रुपये तर ११ क्विंटल वाळवलेल्या लाल मिरचीला २५० रुपये प्रती किलो दर मिळून २ लाख ७५ हजार रुपये असे ३ लाख ७७ हजारांचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. पावसाळा असल्याने हिरव्या मिरचीची आणखी तोडणी होणार आहे. लागवडीनंतर साधारण १५  महिने हे पिक शेतात उत्पादन देत राहते. अवघ्या दीड एकरातील तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र गोडवा निर्माण केल्याने सुगीचे दिवस आले आहेत. 

अशी केली लागवड व देखरेख ...२५ डिसेंबर २०२२ रोजी शेताची पूर्व मशागत करत ४ बाय १ अंतराने मल्चींग केलेल्या बेडवर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शार्क १ या मिरची वाणाची १५ हजार रोपे लागवड केली . यात २ हजार रोपांची तुट झाली तर त्यातील १३ हजार रोपे जीवंत राहीले .प्रारंभी बेडमध्ये  शेणखतासह सुपर फॉस्फेट १ क्विंटल , निमपेंड १ क्विंटल , पोटॅश ५० किलो , मायक्रोन्युट्रीएन्ट १५  किलो रासायनिक खत मातील मिसळून दिला . आतापर्यंत किड व बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  बुरशीनाशक व पिप्रोनील च्या ५ फवारण्या केल्या आहेत . उन्हाळ्यात गरजेनुसार पाणी दिले. मिरची तोडणी मजुरांकडून करून घेतली. तोडणीसाठी प्रती किलो दहा रुपये एवढा खर्च आला आहे .

चांगले उत्पादन मिळाल्याचे समाधान 

वडिलोपार्जित शेतीत सातत्याने उसाचे पीक घेण्यात आल्याने जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादनामध्ये कमालीची घट झाली होती. यामुळे प्रयोगशील शेतकरी माझे मामा दिलीपराव साबळे यांनी मिरची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी झाला. सध्या वाळलेल्या मिरचीला २७० रुपये किलोप्रमाणे मागणी आहे. आणखी काही दिवस चांगले उत्पादन मिळेल.- ऋषिकेश घुंबरे, प्रयोगशील शेतकरी, वाघाळा ता पाथरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी