शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कापूस विक्रीतून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:18 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़

ठळक मुद्देयावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़ या भाववाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ 

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ परंतु, नैसर्गिक संकटाने कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळाले़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल, अशी  अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती़  यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीला ५ हजार रुपये ते ५ हजार २० रुपयापर्यंतचा प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला़ त्यामुळे कापसाला ६ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ ज्या शेतकऱ्यांना आपले दैनंदिन व्यवहार धकविण्यासाठी पैशांची गरज होती़ त्या शेतकऱ्यांनी कमी भावात आपला कापूस विक्री केला़ बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्येच राखून ठेवला होता़

व्यापाऱ्यांनी १५ मेपर्यंतच कापूस विक्री होईल, असे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली़ भाव वाढणार नाही, या आशेने १५ ते २५ मेपर्यंत ९९ टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला़ मात्र २६ मेपासून कापसाला ५ हजार  ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़ त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा जिल्ह्यातील कापूस उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

कापसाला बोनस देण्याची मागणीयावर्षीच्या खरीप हंगामातील कापसावर पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेले अनुदानही कापूस उत्पादकांपर्यंत अजून पोहचले नाही़ त्यामुळे अनुदानाबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारपेठेमध्ये विक्री केला आहे़ त्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड