शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कापूस विक्रीतून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:18 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़

ठळक मुद्देयावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़ या भाववाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ 

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ परंतु, नैसर्गिक संकटाने कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळाले़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल, अशी  अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती़  यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीला ५ हजार रुपये ते ५ हजार २० रुपयापर्यंतचा प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला़ त्यामुळे कापसाला ६ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ ज्या शेतकऱ्यांना आपले दैनंदिन व्यवहार धकविण्यासाठी पैशांची गरज होती़ त्या शेतकऱ्यांनी कमी भावात आपला कापूस विक्री केला़ बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्येच राखून ठेवला होता़

व्यापाऱ्यांनी १५ मेपर्यंतच कापूस विक्री होईल, असे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली़ भाव वाढणार नाही, या आशेने १५ ते २५ मेपर्यंत ९९ टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला़ मात्र २६ मेपासून कापसाला ५ हजार  ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़ त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा जिल्ह्यातील कापूस उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

कापसाला बोनस देण्याची मागणीयावर्षीच्या खरीप हंगामातील कापसावर पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेले अनुदानही कापूस उत्पादकांपर्यंत अजून पोहचले नाही़ त्यामुळे अनुदानाबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारपेठेमध्ये विक्री केला आहे़ त्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड