शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कापूस विक्रीतून शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:18 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़

ठळक मुद्देयावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील कापूस बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केला आहे़ विक्री करताना शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला़ मात्र गेल्या दोन दिवसांपासून कापसाचे भाव वधारले आहेत़ या भाववाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ 

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती़ परंतु, नैसर्गिक संकटाने कापूस उत्पादनात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळाले़ त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल, अशी  अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होती़  यावर्षीच्या खरीप हंगामातील सुरुवातीला ५ हजार रुपये ते ५ हजार २० रुपयापर्यंतचा प्रतिक्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळाला़ त्यामुळे कापसाला ६ हजार रुपयापर्यंतचा भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ ज्या शेतकऱ्यांना आपले दैनंदिन व्यवहार धकविण्यासाठी पैशांची गरज होती़ त्या शेतकऱ्यांनी कमी भावात आपला कापूस विक्री केला़ बहुतांश कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्येच राखून ठेवला होता़

व्यापाऱ्यांनी १५ मेपर्यंतच कापूस विक्री होईल, असे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली़ भाव वाढणार नाही, या आशेने १५ ते २५ मेपर्यंत ९९ टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला़ मात्र २६ मेपासून कापसाला ५ हजार  ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळील कापूस विक्री झाल्यानंतरच कापसाचा भाव वधारला आहे़ त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा जिल्ह्यातील कापूस उत्पादकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ 

कापसाला बोनस देण्याची मागणीयावर्षीच्या खरीप हंगामातील कापसावर पहिल्याच वेचणीनंतर बोंडअळीने हल्ला चढविला़ त्यामुळे जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेले अनुदानही कापूस उत्पादकांपर्यंत अजून पोहचले नाही़ त्यामुळे अनुदानाबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजारपेठेमध्ये विक्री केला आहे़ त्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीcottonकापूसagricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड