शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:51 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ५३ हजार शेतक-यांचा समावेशपरभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले होते प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतक-यांना फायदा

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. 

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतक-याचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील पात्र शेतक-यांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यताील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतक-यांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतक-यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.   

प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतक-यांना फायदाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पूर्णत: परतफेड केलेल्या शेतक-यांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतक-यांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची  रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी