शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

परभणीत बाजारपेठ बंद ठेवून व्यापा-यांचा मनपावर मोर्चा; दुकानांचे सील तत्काळ काढण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:33 IST

व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देएलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ७ व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकले आहे.आयुक्तांनी न्यायालयाच्या निकालाचा अपमान केल्याचा आरोप व्यापा-यांचा आरोप

परभणी : व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ७ व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकले आहे. मनपाच्या या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी मनपावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास शिवाजी चौकातून सुरुवात झाली. गांधी पार्क येथे आल्यानंतर व्यापा-यांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर नारायण चाळ परिसरात हा मोर्चा आल्यानंतर आयुक्त रेखावार यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करत आयुक्तांनी न्यायालयाच्या निकालाचा अपमान केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी केला. त्यानंतर विसावा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापा-यांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापा-यांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थाकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तत्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा देत मनपा आयुक्त रेखावार यांचा निषेध केला. 

मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापा-यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत दुकानांना ठोकलेले सील काढावे अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असा सवाल केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, संजय मंत्री, सचिन अंबिलवादे, नितीन वट्टमवार, नंदकिशोर अग्रवाल सायकलवाले,अशोक माटरा, दिलीप खैराजानी, सुनील अग्रवाल, सतीश नारवानी, नंदकिशोर अग्रवाल,  मनोज माटरा यांच्यासह २०० ते ३०० व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.  

आयुक्तांशी तीन तास झाली चर्चाव्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापा-यांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापा-यांचे पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या कक्षामध्ये जावून त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापा-यांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले. 

टॅग्स :parabhaniपरभणी