शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

परभणीत बाजारपेठ बंद ठेवून व्यापा-यांचा मनपावर मोर्चा; दुकानांचे सील तत्काळ काढण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:33 IST

व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देएलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ७ व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकले आहे.आयुक्तांनी न्यायालयाच्या निकालाचा अपमान केल्याचा आरोप व्यापा-यांचा आरोप

परभणी : व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ७ व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकले आहे. मनपाच्या या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी मनपावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास शिवाजी चौकातून सुरुवात झाली. गांधी पार्क येथे आल्यानंतर व्यापा-यांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर नारायण चाळ परिसरात हा मोर्चा आल्यानंतर आयुक्त रेखावार यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करत आयुक्तांनी न्यायालयाच्या निकालाचा अपमान केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी केला. त्यानंतर विसावा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापा-यांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापा-यांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थाकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तत्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा देत मनपा आयुक्त रेखावार यांचा निषेध केला. 

मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापा-यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत दुकानांना ठोकलेले सील काढावे अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असा सवाल केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, संजय मंत्री, सचिन अंबिलवादे, नितीन वट्टमवार, नंदकिशोर अग्रवाल सायकलवाले,अशोक माटरा, दिलीप खैराजानी, सुनील अग्रवाल, सतीश नारवानी, नंदकिशोर अग्रवाल,  मनोज माटरा यांच्यासह २०० ते ३०० व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.  

आयुक्तांशी तीन तास झाली चर्चाव्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापा-यांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापा-यांचे पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या कक्षामध्ये जावून त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापा-यांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले. 

टॅग्स :parabhaniपरभणी