शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

अरुंद पुलावर बसचे पाटे तुटले; बसचालकाने प्रसंगावधान राखून ५७ प्रवाशांचा जीव वाचवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:42 IST

येलदरी येथील अरुंद पुलावरील घटना

ठळक मुद्देधावत्या बसचे तुटले पाटे

येलदरी (जि. परभणी) : औरंगाबादहून जिंतूर-येलदरीमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारामध्ये मोठ्या प्रमाणात  नादुरुस्त बस आहेत. असे असतानाही नादुरुस्त बस लांबपल्यासाठी पाठविल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येलदरी येथील अरूंद पुलावर आला. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या धरणावर अरुंद पूल आहे. या पुलावरून औरंगाबादहून जिंंतूर -येलदरीमार्गे रिसोडकडे जाणारी एम.एच. ०६ एस.८९०८ क्रमांकाची बस सायंकाळी ६.३० सुमारास जात असताना अचानक बसचे पाटे तुटले. त्यामुळे ही बस चक्क पुलाकडे घसरत येत असतानाच बसचे चालक विजय पदमाने यांनी प्रसंगावधान राखत  घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ब्रेक लावले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली पडतापडता वाचली. त्यामुळे  ५७ प्रवाशांचे जीव वाचले. या बसमध्ये रिसोड, सेनगाव, हिंगोली, वाशिम आदी ठिकाणचे प्रवासी  होते. आपला जीव वाचल्याने प्रवाशांनी  बसचालकाचे आभार मानले. 

एका महिन्यातील दुसरी घटना ६ सप्टेंबर रोजी जिंतूर-रिसोड या बसला याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी ६२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक मधुकर घुगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांंचे जीव वाचले होते. त्यातच आता १९ सप्टेंबर रोजी येलदरी येथील याच अरुंद पुलावरून वळण घेताना बसचे पाटे तुटल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघातparabhaniपरभणी