शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत खराब रस्त्यामुळे १० गावांना जोडणा-या २४ बसफेर्‍यांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 19:23 IST

दररोज १५ हजार रुपये उत्पन्न देणार्‍या परभणी ते कुंभारी या मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. रस्ता चांगला नसल्याने महामंडळ या निर्णयापर्यंत आले आहे. यामुळे प्रवाशांच्या त्रासाबरोबरच महामंडळाला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

परभणी : दररोज १५ हजार रुपये उत्पन्न देणार्‍या परभणी ते कुंभारी या मार्गावरील बसफेर्‍या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. रस्ता चांगला नसल्याने महामंडळ या निर्णयापर्यंत आले आहे. यामुळे प्रवाशांच्या त्रासाबरोबरच महामंडळाला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे.

कुंभारी ते परभणी हे २५ कि.मी.चे अंतर आहे. या मार्गावर टाकळी, शहापूर, तुळजापूर, आर्वी, वाडी, गोविंदपूर, इस्माईलपूर, कुंभारी बाजार, डिग्रस, कार्ला, कुंभारी दुधना आदी १० गावांतील प्रवासी दररोज एस.टी. बसने प्रवास करतात. परभणीला कामानिमित्त येणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परभणी आगाराला या बससेवेतून मोठे उत्पन्नही मिळते. मात्र एक -दोन वर्षापासून टाकळी कुंभकर्ण ते कुंभारी बाजार या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. काही महिन्यांपूर्वी शहापूर ते कुंभारी बाजार हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा रस्ता ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे महामंडळाच्या बस या रस्त्यावरुन ये-जा करताना टायर पंक्चर होणे, स्प्रिंग तुटणे यासह इतर आर्थिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यातून बस चालविताना चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चालक व वाहकांच्या अनेक तक्रारी आगारप्रमुख डी.बी.काळम पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यावरुन काळम पाटील यांनी तहसीलदार, विभागीय नियंत्रक, ग्रामपंचायत यांना पत्र पाठवून समस्येची माहिती दिली. मात्र रस्ता दुरुस्तीकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी आगारप्रमुख  काळम पाटील यांनी रस्त्याअभावी परभणी ते कुंभारी ही बस ७ जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बस बंद झाल्यास १० गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लक्ष देऊन या प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

अवैध वाहतुकीला मिळणार  चालनापरभणी- कुंभारी या रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रस्त्याला जवळपास १० गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या गावातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पर्यायाने प्रवासी या रस्त्यावर चालणार्‍या अवैध वाहतुकीकडे वळतील. त्यामुळे यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढून ७ जानेवारीपासून बंद करण्यात येणारी बस पूर्ववत चालू ठेवावी. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलेटाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा संबंधितांना पत्र व्यवहार केला. परंतु, कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे परभणी ते कुंभारी बस ७ जानेवारीपासून बंद करावी लागत आहे.- डी.बी.काळम पाटील, आगारप्रमुख

काम सुरु आहे टाकळी कुंभकर्ण ते शहापूर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्ता कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. -शिराढोणगावकर, अभियंता