शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पुस्तकरुपी ज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी ...

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी संशोधन व विस्तारासंबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने बदलत्या हवामानातील अद्ययावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर प्रत्येक रविवारी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. सुरेशकुमार चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी, माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.प्रवीण वैद्य यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी यांनी मृद शास्त्रज्ञांनी संशोधनाबरोबरच कृषी विस्तार कार्यांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निश्चित उपयुक्त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामान आधारित स्मार्ट तंत्राचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादनात वाढ होईल, असे मत अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मांडले. डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक सहभागी

परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी.चंद्रशेखर राव, डॉ. च.श्रीनिवास राव, डॉ. डी.एल.एन.राव, डॉ. दीपक रंजन बिसवास, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती यांची या व्याख्यानमालेत व्याख्याने झाली.