शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकरुपी ज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी ...

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी संशोधन व विस्तारासंबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने बदलत्या हवामानातील अद्ययावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर प्रत्येक रविवारी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. सुरेशकुमार चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी, माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.प्रवीण वैद्य यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी यांनी मृद शास्त्रज्ञांनी संशोधनाबरोबरच कृषी विस्तार कार्यांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निश्चित उपयुक्त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामान आधारित स्मार्ट तंत्राचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादनात वाढ होईल, असे मत अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मांडले. डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक सहभागी

परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी.चंद्रशेखर राव, डॉ. च.श्रीनिवास राव, डॉ. डी.एल.एन.राव, डॉ. दीपक रंजन बिसवास, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती यांची या व्याख्यानमालेत व्याख्याने झाली.