शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पुस्तकरुपी ज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी ...

परभणी :आत्मनिर्भर भारत निर्मितीमध्ये ग्रामस्तरावर मृदा, पाणी, वनस्पतींचे शिक्षण, संशोधन पोहचविणे हे शाश्वत शेतीचे महत्वाचे धोरण आहे. त्याचबरोबर कृषी संशोधन व विस्तारासंबंधित पुस्तकरुपी ज्ञान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीने बदलत्या हवामानातील अद्ययावत शेतीत मृदा आरोग्य व्यवस्थापनाचा नावीन्यपूर्ण दृष्टिकोन या विषयावर ५ सप्टेंबर ते ५ डिसेंबर प्रत्येक रविवारी ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी डॉ. सुरेशकुमार चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेशकुमार चौधरी, माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ.प्रवीण वैद्य यांची उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत हैदराबाद येथील इक्रीसॅट संस्थेचे माजी संचालक डॉ. एस.पी. वाणी यांनी मृद शास्त्रज्ञांनी संशोधनाबरोबरच कृषी विस्तार कार्यांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. कृषी संशोधन व कृषी विस्तार या दोन गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आयोजित व्याख्यानमालेमुळे मातीच्या आरोग्याबाबत शेतकरी, शास्त्रज्ञ, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निश्चित उपयुक्त माहिती मिळाली. शाश्वत शेती क्षेत्रात हवामान आधारित स्मार्ट तंत्राचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग केल्यास उत्पादनात वाढ होईल, असे मत अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी मांडले. डॉ. प्रवीण वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पपिता गौरखेडे यांनी सूत्रसंचालन केले.

देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक सहभागी

परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत देश-विदेशातील १९० शास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. शास्त्रज्ञ डॉ. डी.के. पाल, डॉ. एस.पी. वाणी, डॉ. ए.के. पात्र, डॉ. पी.चंद्रशेखर राव, डॉ. च.श्रीनिवास राव, डॉ. डी.एल.एन.राव, डॉ. दीपक रंजन बिसवास, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. सुरेशकुमार चौधरी, डॉ. देबाशीस चक्रबोर्ती यांची या व्याख्यानमालेत व्याख्याने झाली.