शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

By मारोती जुंबडे | Updated: September 3, 2024 18:30 IST

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान

परभणी : रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत जिल्ह्यात १३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. ५२ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे.

दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाथरी मंडळात तर जणू काय अभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली. २२९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे या पुराचे व पावसाचे पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरले. या पाण्यामुळे सोयाबीन, तूर व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना नेमके अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले, याचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार अहवाल ही तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दि. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे २ लाख ९८ हजार ३५६ हेेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करते? याकडे जिल्ह्यातील बळीराजांचे लक्ष लागले आहे.

परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर बाधितजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ हेक्टर क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पूर, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

असे झाले तालुकानिहाय नुकसानजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार ३१६, गंगाखेड २७ हजार, सोनपेठ १६ हजार ८१, पालम २९ हजार ९४०, पाथरी ३२ हजार ६१६, मानवत २६ हजार ११५, जिंतूर ३९ हजार ४८९, पूर्णा २७ हजार ५९५, तर सेलू तालुक्यात ३७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत.

पालकमंत्र्यांना वेळ मिळेनापरभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिके वाढविली होती. मात्र सोमवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिके मातीमोल झाली आहेत. परंतु, अद्यापही पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा पालकमंत्र्यांना परभणीत येण्यास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी