शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

By मारोती जुंबडे | Updated: September 3, 2024 18:30 IST

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान

परभणी : रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत जिल्ह्यात १३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. ५२ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे.

दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाथरी मंडळात तर जणू काय अभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली. २२९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे या पुराचे व पावसाचे पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरले. या पाण्यामुळे सोयाबीन, तूर व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना नेमके अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले, याचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार अहवाल ही तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दि. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे २ लाख ९८ हजार ३५६ हेेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करते? याकडे जिल्ह्यातील बळीराजांचे लक्ष लागले आहे.

परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर बाधितजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ हेक्टर क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पूर, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

असे झाले तालुकानिहाय नुकसानजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार ३१६, गंगाखेड २७ हजार, सोनपेठ १६ हजार ८१, पालम २९ हजार ९४०, पाथरी ३२ हजार ६१६, मानवत २६ हजार ११५, जिंतूर ३९ हजार ४८९, पूर्णा २७ हजार ५९५, तर सेलू तालुक्यात ३७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत.

पालकमंत्र्यांना वेळ मिळेनापरभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिके वाढविली होती. मात्र सोमवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिके मातीमोल झाली आहेत. परंतु, अद्यापही पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा पालकमंत्र्यांना परभणीत येण्यास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी