शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित

By मारोती जुंबडे | Updated: September 3, 2024 18:30 IST

कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान

परभणी : रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत जिल्ह्यात १३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. ५२ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे.

दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाथरी मंडळात तर जणू काय अभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली. २२९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे या पुराचे व पावसाचे पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरले. या पाण्यामुळे सोयाबीन, तूर व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना नेमके अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले, याचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार अहवाल ही तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दि. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे २ लाख ९८ हजार ३५६ हेेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करते? याकडे जिल्ह्यातील बळीराजांचे लक्ष लागले आहे.

परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर बाधितजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ हेक्टर क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पूर, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

असे झाले तालुकानिहाय नुकसानजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार ३१६, गंगाखेड २७ हजार, सोनपेठ १६ हजार ८१, पालम २९ हजार ९४०, पाथरी ३२ हजार ६१६, मानवत २६ हजार ११५, जिंतूर ३९ हजार ४८९, पूर्णा २७ हजार ५९५, तर सेलू तालुक्यात ३७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत.

पालकमंत्र्यांना वेळ मिळेनापरभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिके वाढविली होती. मात्र सोमवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिके मातीमोल झाली आहेत. परंतु, अद्यापही पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा पालकमंत्र्यांना परभणीत येण्यास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी