शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीच्या राजकारणात भाजपा ‘मायनस’

By admin | Updated: September 28, 2014 23:52 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी चार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला

अभिमन्यू कांबळे, परभणीचार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्याच्या तडजोडीच्या राजकारणात मात्र भाजपा मायनसच असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या भाषेमुळे भाजपाकडून चारही ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा तडजोडीच्या राजकारणामुळे फोल ठरली आहे. भाजपाचा एकमेव बालेकिल्ला व तब्बल चार वेळा येथील नेतृत्व करण्याची संधी मिळालेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे हे चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजी नाट्यावरुन रविवारी परभणीत भाजपाच्या दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.सुभाष कदम यांनी पोलिसात तक्रारीही दिली आहे. दुसऱ्या गटाकडून मात्र कसलीही तक्रार देण्यात आलेली नाही. पत्रकार परिषदेनंतर झालेल्या या नाट्यामुळे भाजपाचा नैतिकपणाही चव्हाट्यावर आला आहे. नेहमीच आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असा टेंभा मिरविणारा भाजपाही इतरांसारखाच आहे, हे यावरुन दिसून आले. पक्षाच्या उमेदवारीवरुन व जागा सोडल्यावरुन घडलेल्या या नाट्यावरुन एक जुना चर्चेला आलेला किस्सा आठवणीला आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एकदा भाजपाचे खा.हुकूमचंद कुशवाह यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारले होते. त्यावेळी कुशवाह यांनी ‘पक्षाने मला तिकीट नाही दिले तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकी दिली होती. या विषयावर पत्रकारांनी अटलबिहारी वाजपेयी यांना छेडले व तुमचा खासदार तिकीट नाही मिळाल्यास आत्महत्या करतो म्हणतो, मग इतरांपेक्षा तुमचा पक्ष वेगळा काय? असा सवाल केल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी शांतपणे उत्तर दिले, ते म्हणाले की, हेच तर आमचे वैशिष्ट्ये आहे. आमचा खासदार आत्महत्या करतो म्हणतो, पण पक्ष सोडेन असे म्हणत नाही. हीच नैतिकता आता मात्र लयास गेल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय रविवारी परभणी आला. गंगाखेडच्या जागेवरुन हाणामारी झाली असली तरी पाथरीतही पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तडजोडीच्या भाजपाच्या राजकारणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. याला फक्त मित्र पक्षाला जागा बहाल केल्याचे नाव देण्यात येते, एवढेच काय ते ....सगळी भांडी खापराचीचइतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करणारा भाजपा पक्षही वेगळा नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विवेकाच्या गप्पा मारणाऱ्या या पक्षाकडून सातत्याने तडजोडीचे राजकारण केले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे सगळी भांडी खापराचीच, असेच भाजपाबाबतीत म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडक शिस्तीमध्ये येथील कार्यकर्ता तयार होतो, असे म्हटले जाते. परंतु, जिल्ह्यातील भाजपाचे राजकारण पाहता, ही कडक शिस्त जाते तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतो. मग ते जिल्हा परिषदेतील राजकारण असो की, नगर पालिकेतील राजकारण असो. स्थिती सारखीच आहे.