शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीच्या राजकारणात भाजपा ‘मायनस’

By admin | Updated: September 28, 2014 23:52 IST

अभिमन्यू कांबळे, परभणी चार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला

अभिमन्यू कांबळे, परभणीचार महिन्यांपूर्वी देशात नरेंद्र मोदी यांच्या लाटेने केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपाने राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्याच्या तडजोडीच्या राजकारणात मात्र भाजपा मायनसच असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात स्वबळाच्या भाषेमुळे भाजपाकडून चारही ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा तडजोडीच्या राजकारणामुळे फोल ठरली आहे. भाजपाचा एकमेव बालेकिल्ला व तब्बल चार वेळा येथील नेतृत्व करण्याची संधी मिळालेला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे हे चांगलेच नाराज झाले आहेत. याच नाराजी नाट्यावरुन रविवारी परभणीत भाजपाच्या दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.सुभाष कदम यांनी पोलिसात तक्रारीही दिली आहे. दुसऱ्या गटाकडून मात्र कसलीही तक्रार देण्यात आलेली नाही. पत्रकार परिषदेनंतर झालेल्या या नाट्यामुळे भाजपाचा नैतिकपणाही चव्हाट्यावर आला आहे. नेहमीच आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असा टेंभा मिरविणारा भाजपाही इतरांसारखाच आहे, हे यावरुन दिसून आले. पक्षाच्या उमेदवारीवरुन व जागा सोडल्यावरुन घडलेल्या या नाट्यावरुन एक जुना चर्चेला आलेला किस्सा आठवणीला आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एकदा भाजपाचे खा.हुकूमचंद कुशवाह यांना पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारले होते. त्यावेळी कुशवाह यांनी ‘पक्षाने मला तिकीट नाही दिले तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकी दिली होती. या विषयावर पत्रकारांनी अटलबिहारी वाजपेयी यांना छेडले व तुमचा खासदार तिकीट नाही मिळाल्यास आत्महत्या करतो म्हणतो, मग इतरांपेक्षा तुमचा पक्ष वेगळा काय? असा सवाल केल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी शांतपणे उत्तर दिले, ते म्हणाले की, हेच तर आमचे वैशिष्ट्ये आहे. आमचा खासदार आत्महत्या करतो म्हणतो, पण पक्ष सोडेन असे म्हणत नाही. हीच नैतिकता आता मात्र लयास गेल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय रविवारी परभणी आला. गंगाखेडच्या जागेवरुन हाणामारी झाली असली तरी पाथरीतही पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तडजोडीच्या भाजपाच्या राजकारणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. याला फक्त मित्र पक्षाला जागा बहाल केल्याचे नाव देण्यात येते, एवढेच काय ते ....सगळी भांडी खापराचीचइतरांपेक्षा वेगळे असल्याचा दावा करणारा भाजपा पक्षही वेगळा नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. विवेकाच्या गप्पा मारणाऱ्या या पक्षाकडून सातत्याने तडजोडीचे राजकारण केले जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे सगळी भांडी खापराचीच, असेच भाजपाबाबतीत म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडक शिस्तीमध्ये येथील कार्यकर्ता तयार होतो, असे म्हटले जाते. परंतु, जिल्ह्यातील भाजपाचे राजकारण पाहता, ही कडक शिस्त जाते तरी कुठे, असा सवाल उपस्थित होतो. मग ते जिल्हा परिषदेतील राजकारण असो की, नगर पालिकेतील राजकारण असो. स्थिती सारखीच आहे.