शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

परभणीत मोर्चाद्वारे विरोधकांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:00 IST

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला़ या मोर्चातून २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची झलक परभणीकरांना अनुभवयास मिळाली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, भाकप, समाजवादी पार्टी आदी विविध विरोधी पक्षांच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या मोर्चातून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला़ या मोर्चातून २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची झलक परभणीकरांना अनुभवयास मिळाली़केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असून, शेतकरी, शेतमजूर, निराधार, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आदींचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत़ असे असताना खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी, समाजवादी पार्टी, भाकप आदी पक्षांच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ त्यानुसार शहरातील शनिवार बाजार भागातील काँग्रेस भवन परिसरात विविध विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी जमा झाले़ त्यानंतर १२़३० च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली़ १़३० च्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला़यावेळी या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, तुकाराम रेंगे, महापौर मीनाताई वरपूडकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, शेकापचे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, भाकपचे कॉ़ राजन क्षीरसागर, पीआरपीचे गौतम मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणिक कदम, रसिका ढगे, किशोर ढगे, नदीम इनामदार, सपाचे मन्सूर खाँ पठाण, युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, रविराज देशमुख, भगवान वाघमारे, उपमहापौर माजू लाला, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री खोबे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नंदा राठोड, ज्ञानेश्वर जोगदंड, सचिन जवंजाळ, अ‍ॅड़ विष्णू नवले, रवि सोनकांबळे, माधुरी क्षीरसागर, रामभाऊ घाडगे, हरिभाऊ शेळके, हफिज चाऊस आदींची उपस्थिती होती़यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी भाजपा व शिवसेनेवर जोरदार टीका केली़ भाजपाच्या धोरणामुळे आज महागाईचा भडका उडाला आहे़ सर्वसामान्य शेतकºयांना हमीभाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, असा आरोप केला़ यावेळी अ‍ॅड़ परिहार, ढगे, क्षीरसागर, गोळेगावकर, रेंगे, सोनकांबळे, हफिज चाऊस आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग यांनी केले़ आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले़...या मागण्यांचे दिले निवेदनमोर्चानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यामध्ये केंद्र शासनाच्या राफेल विमान घोटाळा प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची नेमणूक करावी, प्रस्तावित वीज, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करावी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची नाफेडमार्फत खरेदी करून शेतकºयांना हमीभाव द्यावा, रमाई घरकूल योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, निराधारांच्या अनुदानात वाढ करावी, २०१७ मधील खरीप पीक विम्याचे मंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे वाटप करावे़मोर्चातील विमान ठरले लक्षवेधीमोर्चात राफेल या विमानाच्या दोन प्रतिकृती आॅटोवर लावण्यात आल्या होत्या़ या प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या़ शिवाय मोर्चामध्ये गॅस सिलिंडर, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे व्यंगचित्र, विविध घोषणांची नामफलके लावण्यात आली होती़ तर काहींनी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचा पोषक परिधान केला होता़

टॅग्स :parabhaniपरभणीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस